लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।
आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥
ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील ही एक ओवी देवळाच्या कळसाचे महत्व सांगण्यासाठी पुरेशी आहे
काही कारणाने जर गाभा-यातील देवतेचे दर्शन होऊ शकले नाही तर किमान कळसाचे दर्शन तरी घ्यावे असे अनेक जण मानतात. याचे प्रत्यंतर आपणास पंढरपूर यात्रेत येते. ज्यांना पांडुरंगाचे दर्शन होत नाही ते कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात.
हे आठवायला आज एक कारण घडले. नेरूळच्या कार्तिकस्वामी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मुळ मूर्ती आणि गाभारा दुस-या मजल्यावर आहे. दर्शन घेत असताना सहज वर लक्ष गेले आणि हे दिसले.
गाभाऱ्याच्या वरती एक काचेची चौकट लावली आहे. समोर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले की लगेच मान वरुन कळस बघायचा, दर्शन घ्यायचे.
तिथे ही एक आरसा लावून कळसाचा 'टाॅप व्ह्यू ' दाखवलाय
सर्वच दक्षिणात्य मंदिरात हे पहायला मिळते की नाही माहित नाही पण या मंदिरात ज्यानी हे क्रिएटिव्ह डिझाईन केले आहे त्या इंजिनियरला सलाम.
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 💐
कार्तीक पोर्णीमा
२७/११/२३

Spot on with this write-up, I really think this amazing site needs a lot
उत्तर द्याहटवाmore attention. I'll probably be back again to read more, thanks for
the info!