१९ जून, २०२६

दत्त भक्त ( संग्रहित )

दत्त भक्त -- याची व्याख्या म्हणजे ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त भक्त . ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारुपी प्रेरणा दिली तो दत्त भक्त . या लीला माहीत असोत व नसोत त्या

ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते  तो दत्त भक्त . महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा  मिळते तो दत्त भक्त . थोडक्यात आपल्या शरीर ,मन ( बुद्धी ) आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्त भक्त . 

पण मग या दत्त भक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे ? तर हि दत्त भक्ती फार दुर्लभ आहे . सर्वाना महाराजांनी ती संधी दिलेली नाही . दत्त माहात्म्यातील सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाला म्हणतात ,माझी भक्ती दुर्लभ जाण l ती तुला मिळाली दैवेंकरून ll (द मा ९/१०५) हि दुर्लभ अशी दत्त भक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहजसाध्य  मात्र अजिबात नाही . या मार्गात पापरूपी सर्प फुत्कार सोडत आहेत ,प्रलोभनांचे भोवरे गिळू पाहत आहेत ,निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत ,नाना संकटे मध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत . 

या सर्वाना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही . पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण हि मनाला दिलासा देणारी आहे . हि आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे . अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका . आधीच मनुष्य जन्म दुर्लभ त्यातही तो भारत वर्षात त्यातही इथे या राज्यात त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत . अल्प स्वल्प का होईना होत राहणे महत्वाचे आहे . किती होत आहे पेक्षा काहीतरी होत राहणे आणि ते हि नित्य हे मोलाचे आहे . तेव्हा या दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत रहा ---
*!!!श्रीगुरुदेव दत्त !!!*
 
---अभय आचार्य

*!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*

२५ फेब्रुवारी, २०२६

असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा


असे कांती भस्मांकित ती जयाची |
तनू झाकली शुभ्र वस्त्रांत त्याची ||
सदा घेई औदुंबराशी विसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||१||

जयाच्या मुखे ज्ञान अमृत लाभे |
जरी थोर देवाधिदेवांत शोभे ||
जरी भाविकांच्या प्रेमे बसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||२ ||

जयाच्या करी दिव्य दंड तो साजे |
कधी व्याघ्रचर्मावरी जो विराजे ||
जिथे पाहू तेव्हा तिथे तो दिसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा || ३ ||

कुठेही कधी होय ज्याची भ्रमंती |
पदी पादुका सिध्द रूद्राक्ष कंठी ||
कधी भक्ताहूनी तो दूरी नसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ४ ||

अमरजा भीमेच्या राही तीराशी |
असे भक्तवत्सल प्रेमाभिलाषी ||
सदा सर्वदाअंतरी या वसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||५ ||

गुरू मित्र बंधू सखा सर्व काही |
सदा सोबती भाविकाचा तो राही || 
कुठे ना कधी भक्त त्याचा फसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ६ ||

प्रपंचातही भक्तिमार्गास लावी |
जणू आप्त इष्टातला भाव दावी 
कधी प्रेमे भक्तासवे तो रूसावा
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||७ ||

किनार्यास ती नाव भक्ताची लावी |
मधुभजनी ज्ञानगंगाच दावी || 
करो बोध ऐसा मनाला ठसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा ||८ ||

( साभार - व्हाट्सअँप समूह )

१४ फेब्रुवारी, २०२६

साडेसाती आणि शनी महात्म्य

साडेसाती आणि शनी महात्म्य 

साडेसातीचा त्रास कमी होण्याच्या अनेक उपायात नित्य किंवा दर शनिवारी 'शनी महात्म्य' पोथीचे वाचन हा एक प्रमुख उपाय म्हणून सांगितला जातो /केला जातो.

साडेसाती लागल्या लागल्या हा उपाय सुरु करणारे  हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतील पण बरेसचे जातक हे,त्रास सुरु झाला की जागे होतात.
अर्थात हे नैसर्गिक आहे कारण आपण सगळे सामान्य आहोत


अशांसाठी मी एक वेगळा विचार मांडतोय. शनी महातम्यात राजा विक्रमादित्य याला साडेसातीत काय  त्रास झाला यांचे वर्णन आणि त्याला अनुसूरून इतर उपकथा आहेत. आपण जेव्हा वाचन करू तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा त्या कथेच्या मुळ भागाशी कशाप्रकारे co-relate होतोय हे पाहायचे. मग तुमचा त्रास आर्थिक, मानसिक, शारीरिक, प्रपंचिक, व्यवसायिक कसाही असो. ( राजा विक्रमदित्य सारखे तुमचे हात -पाय तोडले गेले पाहिजेत असे नाही )
कुठे तरी लिंक लागतेच

आणि मग यातून निस्तरून जाण्याची विनंती शनी महाराजांना करायची. 

याने त्रास लवकर कमी होईल / संपेल वगैरे सांगणे हा या लेखाचा हेतू नाही तर राजा विक्रमादित्य ज्याप्रकारे शरण गेला होता / चुक कळली होती / सरेंडर झाला होता किमान त्याच्या किती प्रमाणात आपण समर्पित व्हायला पाहिजे हे आपापले ठरवायचे 

शनी महाराजांची कृपा आपल्या सर्वावर राहो या सदिच्छा 

देवा तुझ्या द्वारी आलो📝
14/2/2026
शनिवार 
शनी प्रदोष 

२० जानेवारी, २०२६

प्रार्थना

*🍁 प्रार्थना 🍁*                     

( what's App साभार ( माघ शु. द्वितीया, २० जाने २६)

एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले , "गुरुजी ,प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून 
कोणी गाऊन ,ओरडून
कोणी करूणा भाकून
कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात ,चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"

*रामदास स्वामी हसले,म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता.अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते.थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले.विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"*

"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे !माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"

*समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ?  'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार?*

म्हणून 

*अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही.तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं*

*।।।जय जय रघुवीर समर्थ।।।*
                    ...🙏....

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या