४ जून, २०२६
१७ मे, २०२६
१६ मे, २०२६
१९ एप्रिल, २०२६
१५ एप्रिल, २०२६
१२ एप्रिल, २०२६
८ एप्रिल, २०२६
२२ मार्च, २०२६
५ मार्च, २०२६
२५ फेब्रुवारी, २०२६
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा
तनू झाकली शुभ्र वस्त्रांत त्याची ||
सदा घेई औदुंबराशी विसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||१||
जयाच्या मुखे ज्ञान अमृत लाभे |
जरी थोर देवाधिदेवांत शोभे ||
जरी भाविकांच्या प्रेमे बसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||२ ||
जयाच्या करी दिव्य दंड तो साजे |
कधी व्याघ्रचर्मावरी जो विराजे ||
जिथे पाहू तेव्हा तिथे तो दिसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा || ३ ||
कुठेही कधी होय ज्याची भ्रमंती |
पदी पादुका सिध्द रूद्राक्ष कंठी ||
कधी भक्ताहूनी तो दूरी नसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ४ ||
अमरजा भीमेच्या राही तीराशी |
असे भक्तवत्सल प्रेमाभिलाषी ||
सदा सर्वदाअंतरी या वसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||५ ||
गुरू मित्र बंधू सखा सर्व काही |
सदा सोबती भाविकाचा तो राही ||
कुठे ना कधी भक्त त्याचा फसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ६ ||
प्रपंचातही भक्तिमार्गास लावी |
जणू आप्त इष्टातला भाव दावी
कधी प्रेमे भक्तासवे तो रूसावा
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||७ ||
किनार्यास ती नाव भक्ताची लावी |
मधुभजनी ज्ञानगंगाच दावी ||
करो बोध ऐसा मनाला ठसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा ||८ ||
( साभार - व्हाट्सअँप समूह )
१४ फेब्रुवारी, २०२६
साडेसाती आणि शनी महात्म्य
साडेसाती आणि शनी महात्म्य
साडेसातीचा त्रास कमी होण्याच्या अनेक उपायात नित्य किंवा दर शनिवारी 'शनी महात्म्य' पोथीचे वाचन हा एक प्रमुख उपाय म्हणून सांगितला जातो /केला जातो.
साडेसाती लागल्या लागल्या हा उपाय सुरु करणारे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतील पण बरेसचे जातक हे,त्रास सुरु झाला की जागे होतात.
अर्थात हे नैसर्गिक आहे कारण आपण सगळे सामान्य आहोत
अशांसाठी मी एक वेगळा विचार मांडतोय. शनी महातम्यात राजा विक्रमादित्य याला साडेसातीत काय त्रास झाला यांचे वर्णन आणि त्याला अनुसूरून इतर उपकथा आहेत. आपण जेव्हा वाचन करू तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा त्या कथेच्या मुळ भागाशी कशाप्रकारे co-relate होतोय हे पाहायचे. मग तुमचा त्रास आर्थिक, मानसिक, शारीरिक, प्रपंचिक, व्यवसायिक कसाही असो. ( राजा विक्रमदित्य सारखे तुमचे हात -पाय तोडले गेले पाहिजेत असे नाही )
कुठे तरी लिंक लागतेच
आणि मग यातून निस्तरून जाण्याची विनंती शनी महाराजांना करायची.
याने त्रास लवकर कमी होईल / संपेल वगैरे सांगणे हा या लेखाचा हेतू नाही तर राजा विक्रमादित्य ज्याप्रकारे शरण गेला होता / चुक कळली होती / सरेंडर झाला होता किमान त्याच्या किती प्रमाणात आपण समर्पित व्हायला पाहिजे हे आपापले ठरवायचे
शनी महाराजांची कृपा आपल्या सर्वावर राहो या सदिच्छा
देवा तुझ्या द्वारी आलो📝
14/2/2026
शनिवार
शनी प्रदोष
२० जानेवारी, २०२६
प्रार्थना
*🍁 प्रार्थना 🍁*
( what's App साभार ( माघ शु. द्वितीया, २० जाने २६)
एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले , "गुरुजी ,प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून
कोणी गाऊन ,ओरडून
कोणी करूणा भाकून
कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात ,चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"
*रामदास स्वामी हसले,म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता.अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते.थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले.विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"*
"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे !माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"
*समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ? 'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार?*
म्हणून
*अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही.तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं*
*।।।जय जय रघुवीर समर्थ।।।*
...🙏....
१० जानेवारी, २०२६
५ जानेवारी, २०२६
सद्गुरू प्रार्थना
🙏🙏 "सद्गुरू प्रार्थना" 🙏🙏
सद्गुरु नाथा, हात जोडीतो अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
||धृ||
निशीदिनी श्रमसी,मम हितार्थ तू,किती तुज शीण देऊ |
ह्रदयी वससी,परी नच दिससी,कैसे तुज पाहू ||१||
उत्तीर्ण नव्हे,तव उपकारा, जरी तनु तुज वाहू |
बोधूनि दाविसी,इहपर नश्वर, मनी उठला बाऊ ||२||
कोण,कुठील मी,कवण कार्य मम,जनी कैसा राहू |
करी मज ऐसा,निर्भय निश्र्चल,सम सकला पाहू ||३||
अजाण हतबल,भ्रमित मनिची,तळमळ कशी साहू |
निरसूनी माया,दावी अनुभव,प्रचिती नको पाहू ||४||
सद्गुरु नाथा,हात जोडीतो, अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे,हितगुज सारे, वद कवणा दावू
||धृ||
🙏 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)








