May 1, 2022

दोन कल्याणकारी मारुती स्तोत्रे

."मंत्र, स्तोत्रे आणि चमत्कार"

वि. के फडके  यांच्या पुस्तकातील
*दोन कल्याणकारी मारुतीस्तोत्रे* या लेखाचे क्रमश: वाचन 
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

भाग - १ 📝



महाराष्ट्राचे महान संत समर्थ श्रीरामदास स्वामी यांनी रचिलेले 'भीमरूपी स्तोत्र' महाराष्ट्रात जितके लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता गोस्वामी तुलसीदासाच्या 'हनुमान चालीसा' ने उत्तर भारतात संपादन केली आहे. ही दोन्ही स्तोत्रे विलक्षण प्रभावी असून त्यांच्या नित्य पठणाने अनेक व्याधी व संकटांचा नाश होतो असा त्यांचा लौकिक आहे.
      समर्थ रामदास आणि गोस्वामी तुलसीदास हे दोघेही परम रामभक्त होते; परंतु परकीयांच्या दबावामुळे सत्व विसरलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करुन त्या समाजाला बलशाली व तेजस्वी बनविण्यासाठी दोघांनीही महारुद्र हनुमंताचा आदर्श सर्वसामान्यांपुढे ठेवला आहे. श्री समर्थांनी जशी अकरा हनुमंतांची स्थापना केली तशीच गोस्वामी तुलसीदासांनी काशी क्षेत्रात बारा हनुमंतांची स्थापना केलेली आहे!
 
      या दोघा महान संत कवींनी रचलेली, 'भीमरुपी स्तोत्र' व 'हनुमान चालिसा स्तोत्र '  ही दोन स्तोत्रे हा देखील हनुमान उपासनेच्या प्रचाराचाच एक भाग होता !

क्रमश:🚩
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
देवा तुझ्या द्वारी आलो 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या