२८ डिसेंबर, २०१५

संकष्टी चतुर्थी

श्री  गणेशाय  नम :!


आज संकष्टी चतुर्थी 
 वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत करण्याच्या  उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या तिस-या  भागात  आज आपण माहिती घेऊ  हेदवी  ( गुहागर  )   येथील  गणपतीचे .

 ( यापूर्वीचा   ' तासगावचा   गणपती ' वरचा लेख इथे वाचू शकाल

पेशवे काळातील हेदवी येथील गणपती मंदिर वेळणेश्वरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे . मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते  पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.
श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते.
अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणाऱ्यानाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते.
संकलीत माहिती : मायबोली संकेतस्थळ ( लेखक - भ्रमर ) 
संकलन : अमोल केळकर 

२१ डिसेंबर, २०१५

दत्ताची आरती आणि इतर अभंग,गाणी

दत्त  जयंती ( २४ डिसेंबर )  निमित्य -  दत्ताची आरती  आणि इतर  अभंग,गाणी  आपल्या संगणकावर / मोबाईलवर उतरवून घ्या .  
( संग्रहीत : देवा तुझ्या द्वारी आलो / www.kelkaramol.blogspot.in )

दत्ताची आरती 


दिगंबरा  दिगंबरा 

गुरुचरित्राचे करावे पारायण 


गुरु महाराज गुरु जय जय 


दत्तासी गाईन 

धन्य धन्य हो प्रदक्षिणा 

श्रीपाद वल्लभ दिगंबरा :-


दत्त नामाचा लागो छंद :-

दत्त दिगंबर  दैवत माझे :-


दत्त दत्त नामाचा महिमा 

दत्ताचा प्रसाद 


निघालो घेऊन दत्ताची पालखी 


निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||

सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||

वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||

निघालो घेवून दत्ताची पालखी

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीताजयंती, म्हणजे आपण हिंदू ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ म्हणतो त्या भगवद्गीतेची जयंती.कुरुक्षेत्रावर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेद आणि उपनिषदे यांचे सार सांगितले, आणि ते तत्वज्ञान म्हणजे 'भगवद्गीता' हिंदू समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे...!


आज परिस्थिती अशी आहे की शाश्वत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि पर्यायाने भगवद्गीतेचा अभ्यास जगभरात अनेक विद्वान करतात आणि इथे अनेक हिंदुंनाच गीतेमधे किती श्लोक आहेत ह्याचासुद्धा पत्ता नाही...! त्यात अगदी हिंदुत्वाचे डिंडिम वाजवणारे सुद्धा अनेक जण असतील !
आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो हे आपल्या समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव ! एक रूढ़ असलेला गैरसमज म्हणजे हे वृद्धापकाळात वाचन करायचे तत्वज्ञान आहे; हा समज फ़क्त आपल्या हिंदू समाजातच रुजला आहे !
खरे तर तरुण वयातसुद्धा भगवद्गीते सारखा अनमोल मार्गदर्शक  ग्रंथ नाही हे निखळ सत्य आपण तरुणांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे !
त्या दृष्टीने शाळा आणि कॉलेज जीवनात आणि नंतर सुद्धा भगवद्गीतेचा सार्थ* ग्रंथ अभ्यासल्यास आपल्या व्यक्तिगत आणि सामजिक अनेक समस्यांचे निराकरण सहज शक्य होईल !
केवळ ७०० श्लोक असलेला हा ग्रंथ आपल्या समाजाने अभ्यासणे हे भारताला उन्नतीकडेच नेईल हे निश्चित !
**
पुढल्या आठवड्यात ज्या संख्येने आवड,फॅशन म्हणून लाल टोप्या घातलेले छोटे आणि मोठे हिंदू बघायला मिळतील तितकेच किंबहुना त्याहुन जास्त भगवद्गीता वाचणारे अभ्यासणारे भारतीय जेंव्हा बघायला मिळतील तो सुदिन !
सण हवे ते साजरे करा पण आपल्या संस्कृतीची मुळं जिथे आहेत ती घट्ट राहतील हे सुद्धा बघणं आवश्यक आहे !
त्यात लज्जास्पद काहीही नाहीच उलट आपण गीता अभ्यासतो हे अभिमानाने सांगण्यासारखे आहे.
भगवद्गीतेचे लहानसे पुस्तक घेतल्यास त्यातही श्लोकाखाली संशिप्त अर्थ असतो आणि पुढे अभ्यासण्यासाठी विस्तृत अनेक विद्वांनाची विवेचने भाष्ये उपलब्ध आहेत !
भगवद्गीता संत ज्ञानेश्वरानी (ज्ञानेश्वरी) विस्तृतरूपात मराठी माणसासाठी लिहीली तशीच एका संस्कृत श्लोकाला एक मराठी श्लोक या साच्यात विनोबा भावे यांनी गीताई सुद्धा लिहीली !
अगदी शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक या दोघांनी याच भगवद्गीतेवर  आपापली भाष्ये लिहिली आहेत ! लोकमान्य टिळकांनी तर आपली मंडाले येथील तुरुंगवासातील वेळ या गीतारहस्य लेखनासाठी उपयोगात आणला !
आपण भारतीयांनी हा अनमोल ठेवा अभ्यासला पाहिजे.. नित्य जीवनात तो आपोआपच उपयोगात येईल  !
गीताजयंती निमित्ताने भारतियांनी गीताभ्यास चालू केला गेला तर गीताजयंती आपोआपच साजरी होईल !
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: |
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||
(सर्व उपनिषदे ह्याच गाई, श्रीकृष्ण हाच त्यांचे दूध काढणारा, अर्जुन(आणि गीताभ्यास करणारे) हा ते दूध प्राशन करणारा भोक्ता (जणु वासरुच) आणि त्या गाईंचे दूध म्हणजे गीतारूपी अमृत.)
सर्वांना भगवद्गीता जयंती निमित्त शुभेच्छा !


हर्षद बर्वे.

८ डिसेंबर, २०१५

दत्तजयंती

दत्तजयंती  - २४/१२/१५

२०१६ सालातील प्रमुख धार्मिक दिवस

२०१६ सालातील  प्रमुख  धार्मिक  दिवस 

१५ जानेवारी  - मकर संक्रांत -  ( रविचा मकर राशीत प्रवेश )
८ फेब्रुवारी - सोमवती अमावस्या
११ फेब्रुवारी - श्री गणेश जयंती 
१२ फेब्रुवारी - वसंत पंचमी
१४ फेब्रुवारी - रथ सप्तमी ( रविवार )
२३ फेब्रुवारी - गुरु प्रतिपदा
१ मार्च - श्री गजानन महाराज प्रकट दिन 
३ मार्च - श्री रामदास नवमी
७ मार्च - महाशिवरात्री ( सोमवार )
९ मार्च - सूर्य ग्रहण
२३ मार्च - हुताशनी पौर्णिमा  ( होळी )
२५ मार्च -श्री  तुकाराम बीज
२८ मार्च - रंगपंचमी
२९ मार्च - श्री  एकनाथ षष्ठी
८ एप्रिल - गुढीपाडवा 
९ एप्रिल - श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 
१४ एप्रिल - गुरु पुष्यामृत योग ( १४. नंतर )
१५ एप्रिल - श्रीराम नवमी
१९ एप्रिल - श्री महावीर जयंती
२२ एप्रिल - श्री हनुमान जयंती
५ मे  - श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी
८ मे  - श्री परशुराम जयंती
९ मे  - अक्षय तृतीया 
११ मे - श्री आद्य शंकराचार्य जयंती
१२ मे  - गुरु पुष्यामृत योग
२० मे  - श्री नृसिंह जयंती
२१ मे  - बौध्द पौर्णिमा
४ जून - शनैश्चर जयंती ( शनी अमावास्या ) 
९ जून  - गुरु पुष्यामृत योग ( सकाळी ७. पर्यंत )
१३ जून - महेश नवमी
१९ जून - वट पौर्णिमा
१९ जुलै  - गुरु पौर्णिमा
२ ओगस्ट - दीपपूजन
७ ऑगस्ट - नागपंचमी
९ ऑगस्ट - सीतला सप्तमी
१० ऑगस्ट- सिंहस्थ समाप्ती
११ ऑगस्ट - गुरु चा कन्या राशीत प्रवेश (  नरसोबावाडी कन्यागत पर्व सुरु )
१२ ऑगस्ट - वरदलक्ष्मी व्रत
१४ ऑगस्ट - पुत्रदा एकादशी
१७ ऑगस्ट - नारळी पौर्णिमा
१८ ऑगस्ट - रक्षा बंधन
२४ ऑगस्ट - श्रीकृष्ण जयंती
३१ ऑगस्ट - पिठोरी अमावस्या
१ सप्टेंबर - बैल पोळा
५ सप्टेंबर - श्री गणेश चतुर्थी 
६ सप्टेंबर - ऋषीपंचमी
९ सप्टेंबर - गौरी पूजन
१५ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी
२० सप्टेंबर - भरणी श्राध्द
३० सप्टेंबर - सर्वपित्री अमावास्या
१ ऑक्टोंबर - घटस्थापना
६ ऑक्टोंबर - ललिता पंचमी
११ ऑक्टोंबर - दसरा 
१५ ऑक्टोंबर - कोजागिरी पौर्णिमा
२९ ऑक्टोंबर - नरक चतुर्दशी
३० ऑक्टोंबर - लक्ष्मी पूजन
३१ ऑक्टोंबर - दिवाळी पाडवा
५ नोव्हेंबर - पांडव पंचमी
१४ नोव्हेंबर -  त्रिपुरारी पौर्णिमा
२१ नोव्हेंबर -कालभैरव जयंती
२८ नोव्हेंबर - सोमवती अमावस्या
३० नोव्हेंबर - देव दीपावली
१३ डिसेंबर - दत्त जयंती 

७ डिसेंबर, २०१५

लग्नाचे मुहूर्त २०१६

२०१६ लग्नाचे  मुहूर्त : ( संदर्भ दाते पंचांग )

जानेवारी २०१६ - १, २, ३ ( रविवार ), ४ , १७ ( रविवार) , २० , २१ , २६ , २८ , २९
                           ३० , ३१ ( रवि )
फेब्रुवारी २०१६ - १,२,३,४,५,११,१३,१६,१७,२२,२४ ,२५,२७ , २८ (रवि )

मार्च २०१६ - १,३,५,६ ( रवि) ,११,१४,१५,२० ( रविवार ) , २१, २५ ,२८, ३१

एप्रिल २०१६ - १, २, ४, १६, १७ (रवि), १९,२२,२३,२४ (रवि), २६,२७,२९,३०

मे २०१६ - १ (रवि)

जुलै २०१६ - ७, १० (रवि) , ११, १२, १३

नोव्हेंबर २०१६ - १६, २१, २३ , २५, २६

डिसेंबर २०१६ - १,३, ४ (रवि) , ५,६,८,१४,१८ (रवि), १९, २०, २४


संग्रहीत :
अमोल केळकर सीबीडी बेलापूर नवी मुंबई ९८१९८३०७७० a.kelkar9@gmail.com

२९ नोव्हेंबर, २०१५

संकष्टी चतुर्थी

श्री  गणेशाय  नम :!


आज संकष्टी चतुर्थी 

 वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या दुस-या भागात  
आज आपण माहिती घेऊ  तासगाव ( जिल्हा :सांगली )   येथील  गणपतीचे .


तासगांवचे गणेश मंदिर व गोपूर
प्रिंट
तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी ( जिल्हा : सांगली )  श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्यांचे प्रसिध्द
सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुमारे २०० वर्षापूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर
गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे.
तासगावचे गणपती मंदिर व त्याचा रथोत्सव भाविकांच्या श्रध्देचा विषय आहे.पशुरामभाऊंनी तासगावला
 उजव्या सोंडेच्या गजाननाचे पंचायतन आणि गोपुरयुक्त मंदिर परिसर असे बांधकाम करण्याचे निश्चित केले.
कर्नाटकातील महादेव शेट्टीबा गवंडी आणि राजस्थानचे चित्रकार यांच्या परिश्रमातून हे गणपती मंदीर १७७९
मध्ये पूर्ण झाले.मंदिराची रचना पाहिली तर पूर्वेचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील नगार खाना, शेजारील रथ गृह,
 लगतच पश्चिम बाजूचे भव्य पटांगण प्रवेशद्वार व त्यावरील
 सात मजली ९६ फूट उंचीचे गोपुर आहे. मुख्य गाभार्‍यात गणपातीची उजव्या सोंडेंची तांबूस गारेची सुबक मूर्ती आहे.
मंदिरची बांधणी दगडी व हेमाडपंथी आहे. सर्व बाजूनी मजबूत अशी तटबंदी,
सुशोभित उद्याने मंदिराची रचना अधोरेखित करते.

गणेश मंदिराच्या बरोबर समोर अर्धा किलो मीटरवर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. मंदेरात दररोज काकड आरती,
 पूजा, दुपारी सायंकाळी आरती व शेजारती होते.तसेच संकष्टी, विनायकी चतुर्थी, सर्व प्रमुख सण,
श्री चा वाढ दिवस व भाद्रपद मास या सर्व दिवशी सायंकाळी श्रीं ची पालखीतून मिरवणूक निघते.
गोंद्गळ्याचे पोवाडे गायन हे त्याचे वैशिष्टय आहे.दरवर्षी श्रावण शुध्द चतुर्थी ते भाद्रपद चतुर्थी
 पर्यत एक महिना देवाचा अभिषेक होतो.
भाद्रपद शुध्द प्रतिपदेपासून श्री च्या वार्षीक उत्सवास सुअरवात होते.रथोत्सवाच्या वेळी गणपती
शंकरास भेटण्यासाठी रथातून जातो.भेट झाल्यानतंर गणपती परत मंदिरात येतो.सांयकाळी श्री ची
महापूजा व प्रसाद वाटप होते.


संकलीत माहिती : माय सांगली.कॉम 
गणेश चित्र साभार : सांगली शिक्षण संस्था  शताब्दी विशेषांक भाग २
संकलन : अमोल केळकर 

२४ नोव्हेंबर, २०१५

सूर निरागस हो. गणपती



सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक. ॐकार गणपती. ॐकार गणपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. लीन निरंतर हो. लीन निरंतर हो... सूर निरागस हो. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया... सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. सूरसुमनानी भरली ओंजळ नित्य रिती व्हावी चरणावर. तान्हे बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सूरातुन. ॐकार गणपती. ॐकार गणपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती. लीन निरंतर हो. लीन निरंतर हो. गणपती. सूर निरागस हो. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया... सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

२३ नोव्हेंबर, २०१५

तुलसी विवाह

तुलसी विवाह — कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो .काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते.त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.

 यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही प्रतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यपुण्यामुळे विष्णूला जालंधराला मारणे अवघड होऊन बसले. तेव्हा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला.हे सर्व वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला. .व ती स्वत; सती गेली. तिच्या मृत्युच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस . म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते. अशीही एक कथा सांगण्यात येते. पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्यावेळेपासून तुलसीविवाहास प्रारंभ झाला असे मानतात. . तुलसी स्तोत्र ——


 तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी | अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम || सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा | द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: || 


 काही मंगलाष्टके -

स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम् । 
बल्लाळं मुरूड विनायक मढं चिंतामणी थेवरम् ॥
लेण्याद्री गिरिजात्मक सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरम् । ग्रामे रांजम संस्थिते गणपती कुर्यात् सदा मंगलम्  ॥ 

 गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा

 कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका 
क्षिप्रा वेत्रवती महा सुरनदी ख्याता ज्या गंडकी 
 पुर्णा पूर्ण जलै : समुद्र सहिता कुर्वंतु वो मंगलम

 रामो राजमणिः सदा विजयते | रामं रमेशं भजे | रामेणाभिहता निशाचरचमू | रामाय तस्मै नमः॥ रामान्नास्ति परायणं परतरं | रामस्य दासोऽस्म्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे| भो राममामुद्धर ||.\

 कुर्यात सदा मंगलम , शुभ मंगल सावधान

 तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव | विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि || || शुभ मंगल सावधान


सर्व माहिती  संग्रहीत 

३० ऑक्टोबर, २०१५

संकष्टी चतुर्थी

श्री गणेशाय नम :! 
 आज संकष्टी चतुर्थी , 
आज पासून दर संकष्टीला गणपती संदर्भात / देवस्थान संदर्भात आणि इतर गणपती संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे . हा उपक्रम आपल्याला आवडल्यास अवश्य कळवा a.kelkar9@gmail.com 

 या लेखन मालेची सुरवात करताना आज आपण माहिती घेऊ पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपती - कसबा पेठ गणपतीची 

 कसबा गणपती हे अखिल पुण्यनगरीचे ग्रामदैवत. चारशेपेक्षा अधिक वर्षांपासुन अस्तित्वात असलेले ! कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दोन ग्रामदैवतं! मुळा, मुठेच्या संगमावर वसलेल्या पुण्यनगरीतील हे गणेश दैवत सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे, म्हणजे अगदी पुरातन असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. मंगलकार्य असो, लग्न , मुंज असो वा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, घरातील पहिली अक्षता जाते ती कसब्याच्या गणपतीला ! 
 हे जयति गजानाना, कार्य निर्विघ्नपणे सिद्धिस जाऊ दे ! अशी प्रार्थनाही केली जाते. मंदिरात गणेशजन्माचा उत्सव वर्षातून तीनदा साजरा करण्यात येतो. या गजाननाच्या पूजनाचे भाग्य अनेक पिढ्यांपासून ठकार घराण्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे. ठकार घराणे मूळचे विजापूरचे ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी विजापूर जिल्ह्यातल्या इंडी तालुक्यातील आठ ब्राह्मण घराणी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून, आपला मुलुख सोडुन निघाली. ठकार, ढेरे, उपाध्ये, धर्माधिकारी, कलंगे, निलंगे, वैद्य, , कानडे अशी ही आठ कुटुंबे ! ही देशस्थ ब्राह्म्ण मंडळी मार्गक्रमण करीत असताना त्यांना नगर जिल्ह्यात अडविण्यात आले. यातील ढेरे कुटुंबातील एका व्यक्तीला बाटविण्यात आले. त्यानंतर ही मंडळी मजल दर मजल करीत पुण्यात पोचली व नदीकाठी असलेल्या भागात स्थायिक झाली. हीच आजची कसबा पेठ ! यातील कलंगे आणि निलंगे सोडून बाकी सर्व सहा घरे आज शेजारी शेजारी आहेत. या प्रवासात ठकारांपैकी श्री. विनायकभट्ट ठकार य़ांच्याकडे त्यांच्या नित्यपूजेतील, गजाननाची मुर्ती होती. तांब्याच्या आकाराएवढी ही मूर्ती ! विनायकभट्टांनी आपल्याच घरात तिची प्रतिष्ठापना करुन तिचे नित्य पूजन सुरु केले. 

 आज अनेक वर्ष केलेल्या सततच्या शेंदुरलेपनामुळे मुळ मूर्ती झाकून गेली आहे. आता ती जवळपास तीन फुट लांब व साडेतीन फुट रुंद अशी दिसते.   कसब्यातील फणी आळीत मंदीराचे प्रवेशद्वार असून ते पूर्वाभिमुख आहे. श्री गजाननाची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूळ मूर्तीची स्थापना केलेला गाभारा दगडी आहे जो राजमाता जिजाऊसाहेबांनी बांधुन दिला आहे व आजही जसाच्या तसा आहे. असे म्हणतात की जेव्हा शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी, अत्यंत काळजीयुक्त मनाने विनायकभट्टांकडे भविष्य जाणण्यासाठी गेल्या. विनायकभट्ट उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी महाराज परत येण्याचा दिवस व वेळ अत्यंत अचूक सांगितली. तो पुढे अर्थातच बरोबर ठरला. यामुळे अत्यंत संतुष्ट होऊन, विनायकभट्टांना काही हवे असल्यास सांगा, असे विचारले. त्यावेळी, स्वत:साठी काहिही न मागता, माझ्या मोरयाला गाभारा बांधुन द्या, असे त्यांनी सांगितले. या गाभा-यात अत्यंत पावित्र्याने , सोवळे नेसुनच प्रवेश करता येतो, मुर्तीला स्पर्श करता येत नाही. या पहिल्या गाभा-याची मंडपी चांदीची आहे, शके १८३१ मध्ये बांधलेली आहे. या मुख्य गाभा-याबाहेर दुसरा गाभारा आहे जिथून भक्त श्री मोरयाचे दर्शन घेऊ शकतात. ह्या गाभा-याची मंडपी शके १८४८ मध्येर रावबहादूर केंजळे यांनी बांधली आहे. असे सांगण्यात येते की, श्री. केंजळे यांनी नव्या पुलाचे कंत्राट घेतले होते परंतु कामात यश येत नव्हते व पुल सारखा पडत होता. त्यावेळी त्यांनी श्री मोरयाला कार्यसिद्धीसाठी नवस बोलला व पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी ही चांदिची मंडपी बांधुन घेतली. मुख्य प्रवेशद्वारात चांदीची महिरप असुन दोन्ही बाजुला संगमरवरी हनुमंत आणि गरुड आहेत. तसेच जय-विजय यांची मोठी चित्रे आहेत जी, श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांनी काढलेली आहेत. बाहेर सभामंडप आहे व दोन्ही बाजूस सुरुचे पाच महिरपदार खांब आहेत. मंदिराच्या वास्तूचा पुढचा भाग तीन मजली असून सर्वात वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. पुर्वी येथुन रोज सनई-चौघडा वादन होत असे. आजही काही विशेष दिवशी (जसे की भाद्रपद, माघ, ज्येष्ठ उत्सव) येथे सनईवादन होते. 

 कसबा गणपतीची ही मूर्ती गजाननाच्या ओळखीच्या स्वरुपापेक्षा खूपच वेगळी आहे. सततच्या शेंदूरलेपनामुळे मूळ मुर्ती त्या लेपनात लुप्त झाली आहे. ह्या गजाननाच्या डोळ्यांच्या ठिकाणी हिरे आणि नाभिकमलात माणिक जडविण्यात आले आहे. देवाची नित्य उपयोगातील उपकरणी चांदीची आहेत, यात मखर , प्रभावळ, मुकुट, चंद्र, गंध, रिद्धी, सिद्धी यांचा समवेश आहे. दिवसातुन दोनदा गजाननाची पूजा होते. विशेष दिवशी जसे की, विनायकी, संकष्टी चतुर्थी, रंगपंचमी, वर्षातील तीन गणेशोत्सव (माघ, ज्येष्ठ, आणि भाद्रपद) गणपतीला “पोशाख” करण्यात येतो. भाविकांच्या श्रद्धेचे पारणे फेडणा-या पोषाखाचे स्वरुप म्हणजे, देवाला सोवळे, भरजरी शाल, मुकुट, व अनेक अलंकार असे असते. देवापूढे दोन पुरुषभर उंचिच्या समयांमध्ये अहोरात्र नंदादीप तेवत असतो. गाभा-यात मुख्य देवतेशिवाय, नंदी-महादेव, दत्त, देवी यांच्या मुर्ती आहेत. तसेच बाहेरच्या बाजूला हनुमानाचे छोटेखानी मंदीर आहे. कसबा गणपती मंदिराचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे रोज रात्री महासाधू मोरया गोसावी यांची पदे अत्यंत भक्तिभावाने, उत्साहाने आणि मुख्य म्हणजे नित्यनेमाने गायली जातात.

सर्व माहिती संग्रहीत

१३ ऑक्टोबर, २०१५

शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा

कोल्हापूर  अंबाबाई देवळातील  नवरात्र पूजा 

१३/१०/२०१५= मंगळवार= आदी लक्ष्मी
१४/१०/२०१५ = बुधवार = धन धन्य लक्ष्मी
१५/१०/२०१५ = गुरुवार =धैर्य लक्ष्मी
१६/१०/२०१५ =शुक्रवार =गज लक्ष्मी
१७/१०/२०१५=शनिवार =  संतान लक्ष्मी
१८/१०/२०१५ = रविवार = त्र्यंबोली भेट / अंबारीतील
१९/१०/२०१५= सोमवार= विजय लक्ष्मी
२०/१०/२०१५ = मंगळवार = विद्या लक्ष्मी
२१/१०/२०१५ = बुधवार =महिषासुर मर्दिनी
२२/१०/२०१५= गुरुवार = गुरु घोडा रथातील
२३/१०/२०१५= शुक्रवार = ऐश्वर्य लक्ष्मी


१६ सप्टेंबर, २०१५

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा



वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी सम:प्रभ
निर्विघ्नम कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा




प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरूनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दारिद्रय़ दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा  भक्ता बहू तोषवी




स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम्  मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्



गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरीनंदना
हे दयानिधे, श्री गजानना




नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर झरे वरी बरे, दूर्वाकुराचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला  स्मरे



गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंद या राघवाचा



मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटय़ानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी


क-हेच्या  तिरी एकसे मोरगावू
तिथे नांदतो मोरया जाण पाहू
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
मनी इच्छिले मोरया देत आहे



पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या