३१ ऑगस्ट, २०१०

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.

डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे यांनी मिसळपाव डॉट कॉम या मराठी संकेतस्थळावर लिहिलेला हा लेख त्यांच्या परवानगीने इथे आहे तसा देत आहे.

ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे. ऋषी पराशर हे या शास्त्राचे जनक होत.ज्योतिष शास्त्र हे "ज्योती" म्हणजे "प्रकाश"अथवा "दिशा"(मार्ग) दाखवणारे शास्त्र होयगम्मत म्हणजे.या शास्त्रास स्वातंत्रपूर्व काळात अमाप राजाश्रय लाभला होता. तरं पाश्चिमात्य जगात ते एक थोतांड व फसवे शास्त्र म्हणून नाकारले जात होते पण १९५० नन्तर चित्र अगदी उलट झाले .पाश्चिमात्य जगात या शास्त्राचे संशोधन सुरु झाले,तरं भारतात बुद्धी वाद्यांचा ,शास्त्रज्ञांचा यांचा या शास्त्राला विरोध सुरु झालायात अंधश्रधा निर्मूलन वाल्यांची गरळ चालू झाली , पहानाf, फ्युचरोलोजी (Futurology ) ज्याला भविष्य शास्त्र म्हणतात आणि ज्यात मागील घडलेल्या घटनाक्रमावर आधारित भविष्यात शकणाऱ्या घटनांचा वेधअथवा अंदाजच घेतला जातो त्याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. खरेतर ते एक अंदाज शास्त्र आहे. पण खागोलशात्रीय घटना व बाबींवर आधारित भविष्य सांगणारे ज्योतिष हे शास्त्रच नाही,व ते एक फसवे शास्त्र आहे असे म्हणणे म्हणजे केवढा विरोधाभास .असे म्हणणारे सांगतात शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. तसेच सूर्य ,राहू,केतू हे ग्रह नाहीतच म्हणून त्यांचा ग्रह म्हणून विचारच करणे चुकीचे आहे. ज्योतिष अथवा शास्त्र हे सामाजिक घटनांवर भाष्य करत नाही किंवा सार्वत्रिक घडामोडींवर व घटनांचे भविष्य वर्तवत नाही असा आक्षेप घेतला जातो.हर्शल नेपच्यून,प्ल्युटो,हे गेले ग्रह आधुनिक काळात शोधले गेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार या शास्त्रात केला जात नाही. त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे .या सर्व बाबींमुळे ज्योतिष शास्त्र निकालातचकाढले जाते.शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. पण हे म्हणणे चुकीचे आहे .कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल. नैसर्गिक शास्त्राच्या कसोटीवर मानस शास्त्र व इतर सामाजिक शास्त्रे पण फसवी ठरतील. खरेतर ती तशी ठरवली गेलीच होती. गेल्या शतकाच्या उत्तरार्द्धापर्यंत मानस शास्त्र हे शास्त्र म्हणून मान्यता पावले न्हवते.कारण मन ही सज्ञाच शास्र ,मुख्यत्वे पाश्चात्य शास्त्रज्ञ , मान्य करीत न्हवते . मन ही भौक्तिक वा दृश्य वस्तू म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही जसा मेंदू ,हृदय इ.अशी त्यांची धारणा होती ,व शास्त्र निरीक्षणात्मक व दृश्य वास्तुमानाचाच विचार करतंआणि आज फक्त विलाज नाही म्हणूनच ,कारण ते शास्त्र नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि त्याच अतीत्वा नाकारता येत नाही अशीं सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था झल्याने, आज त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे .त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.तसेच सूर्य ,राहू,केतू, यांना ग्रह मानाने ही एक सोय आहे. त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व त्याचा अभ्यास महत्वाचा .जसं अर्थाश्स्त्रात नफा हा व्याजाचाच घटक अथवा जमीन (land) ह्या संकल्पनेत .सर्व निसर्ग संपत्ती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे कुणी अर्थशास्त्र निकालात काढत नाही,,तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.हर्शल,नेपच्यून ,प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो .महाभारतात त्यांचा उल्लेख श्यामल वरुण,आणि,प्रजापती असा उल्लेख आढळतो .त्यांची आजही नाव ग्रहांबरोबर ,विशेषता वरुणाची ,पूजा होते व ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्फोटके ,अणु परमाणु(हर्शल),अंतर्मन(नेपच्यून) ,व सामाजिक घटना (प्रजापती) दर्शवतात. थोडक्यात ज्योतिष शास्त्राला फसवे ठरवण्याही. साठी घेतले जाणारे सारे आक्षेपच " फसवे " ठरतात.
या उलट ज्योतिष शास्त्रावरील विश्वासाची अतालता जगात कोठेही नाकारता येत नाही. . उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले. येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात. हा इतर व्यवसायांप्रमाणे येथेही दांभिकता आहे,अर्धवट ज्ञान असलेले लोक आहेत पण त्यामुळे शास्त्र खोटे ठरत नाही .राशी भविष्य हे सर्व साधारण भविष्य असते एखादा पोपट वाला ज्योतिषी किंवा सुशिक्षित सज्जन ज्योतिषी पण चूक करू शकतो पण त्यामुळे शास्त्रच निकालात काढणे म्हणजे एखाद्या डॉक्टरच निदान चुकलं म्हणून वैद्यक शास्त्रच अवैध ठरव्ण्या सारख आहे .जेवढ एखाद्याच्या ज्ञानाचं कुंपण तेवढी त्या व्यक्तीची झेप. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा औपचारिक अभ्यास होणे महत्वाच व अती आवश्यकच आहे. औपचारिक अभ्यास सुरु केल्यानंतर सुशिक्षित व जबाबदारज्योतिषी तयार होतील.त्यांची बार कौन्सिल वा मेडिकल कौन्सिल सारखी regulatory authority स्थापन होऊ शकेल त्यामुळे शास्त्राची औपचारिक विश्वासाहर्ता वाढेल .थोडक्यात या शास्त्राचा अभ्यास होणे महत्वाचे होय. या संदर्भात न्यूटनने एडमंड ह्यले याला दिलेले उत्तर समर्पक आहे.न्यूटनचा ज्योतिष शास्त्रावर गाढ विश्वास होता. ह्यालेने त्यांना आपला ज्योतीशास्त्रावर एवढा विश्वास कसा काय? असा प्रश्न केला तेंव्हा "मी वस्तू विषयाचा अभ्यास केला आहे तू तो केलेला नाहीस म्हणून माझा विश्वास आहे तुझा नाही." असे उत्तर दिलेया मुळेच कदाचित विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants commission) ,जी भारतीय उच्य शिक्षणाची शिखर संस्था आहे,ज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या मुले सुशिक्षित ज्योतिषी तयार होतील वा या शास्त्राचा औपचारिक अभ्यास होईलआणि ढोंगीपणावर ताबा ठेवता येईल. ही शिफारस २००१ साली वा ती स्वीकारली गेली असती तरं एव्हांना दोन तुकड्या तयार झाल्या असत्या .पण ते भाग्य या शास्त्राच्या वाट्यास यावयास अजून अवकाश होता.कारण त्या शिफारशीच्या विरुद्ध आव्हाहन दिले गेले हे आव्हाहन श्री भार्गव नावाच्या व्यक्तीने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दिले गेले परंतु ते आव्हाहन उच्च न्यायालयाने फेटाळून लावले .पण याने समाधान होईल ते बुद्धिवादी कसले?
यासाठी जनहित मंच नावाची संस्था कामाला लागली. व या मंचच्या वतीने श्री भगवान रैयानी यांनी याचिका दाखल केली .ड्रग व मेजिक कायदा (Drug and Magic Act )१९५४ या खाली त्यांनी ज्योतिष ,वास्तू शास्त्र (भारतीय वस्तू विज्ञान महती ऐकून अमेरिकन राष्ट्र अधक्ष्यांनी अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिरास याच सुमारास भेंट दिली होती हे लक्षात घेणे येथे महत्वाचे)व इतर संबधित शास्त्रांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या शास्त्रा वरबंदी घालण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली . पण ही ती याचीकापण एप्रिल २०१० च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे याच वर्षी रद्द केली गेली .यासंदर्भात ड्रग कंट्रोलर डॉक्टर पी. रामकृष्ण यांनी ज्योतिष शास्त्राचा बाजूने जनहितार्थ प्रतिज्ञापत्र सदर केले. या प्रतिज्ञापत्रात ते लिहतात "ज्योतीश्शात्र हे चार हजारहून अधिक जुने 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित आहे"
या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे .त्याचा आत्तातरी औपचारिक अभ्यास व संशोधन सुरुहोणे आवश्यक आहे मंचाद्वारे मी हे अपील करीत आहेकि भारतीय ज्योतिषशास्त्र हे सूक्ष्म व योग्य , वैशिष्ट्यपूर्ण आहे . भारतात या बाबतीतपुढाकार घेतला जाने आपल्या दृष्टीने हितावह आहे .
या बरोबरच ज्योतीश्शात्राच्या भविष्य कथनाचीपरीक्षा घेणे आवश्यक आहे असेसर्वश्री जयंत नारळीकर,,कुंटे,घाटपांडे यांनी करंट सायन्स च्या ( "Current Science ")९६ व्या व्हॉल्यूम पान ६४१-४६ मार्फत सुचवले आहे पण याच बरोबर भविष्य सांगण्याची पद्धत , नैतिकता , कायदा , मानसिकता ,सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यावरही विचार विनिमय होणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने अभ्यासक्रम आखणे आवश्यक आहे. या पद्धतीनेच होमियोपथी या चिकित्सा पद्धतीने ने अलोपथी या पाश्चात्य चिकित्सा वा औषध पद्धतीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.ज्योतिष शास्त्रा चा चिकित्सा(dignosis )व औषधोपचार या साठी उपयोग केला जाउ शकतो .खरे तरं" औषध ज्योतिष "(Medical Astrology ) हा एक संपूर्ण विषयच आहे. म्हणजेच ज्योतिष शास्त्राचा साधारण (General ) व विशेष ( Special )(विवाह ज्योतिष,आरोग्य ज्योतिष, औषध ज्योतिष , रत्न ज्योतिष ,व्यवसाय ज्योतिष, गुन्हे ज्योतिष इ. ) आभ्यासक्रम तयार करता येउ शकतात .
सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पास्च्यात्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास व संशोधन सुरु केलेले आहे.मिशेल गौकालीन या नावाच्या संशोधकाने १९५५ साली मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला .त्याने अनेक अये एठलीटचा (मैदानी खेळाडूंचा )अभ्यास केला व त्यांचा मंगल बलवान असतो असा सिद्धांत मांडला व त्याला "मंगल परिणाम"="मार्स इफेक्ट "असे नामकरण केले.त्याचा हा मार्स इफेक्ट जगप्रसिद्धह आहे . (खरेतर खेळाडू ,पोलीस, मिलिटरी ,सर्जन ,इ चा मंगल बलवान असतो हे आपल्याकडे पूर्वापार सामान्यपणे माहित आहे. पण भाव मिशेल(पाश्चिमात्य संशोधक ) खावून जातो(जातात) हेही नवीन नाही .मिशेलच्या संशोधनानंतर तेहे ज्योतिष संस्था स्थापण्याचा व नियतकालिके निघण्याचा धपाटा सुरु झाला. तशी लाटच सुरु झाली. या पैकी एकूण दहा देशातील चौपन्न संशोधकांचे संशोधन "रिसेंट अडवान्सेस इन अष्ट्रोलोजी "=Recent Advances In Astrology "या नावे उपलब्द्ध आहे .तेथे चारशेच्यावर नियत्कालिक या विषयावर निघतात .पाश्चात्य विद्यापीठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन व मान्यता देतात. प्रतुत लेखाकांस संशोधनासाठी अशी परवानगी कोलंबस क्रेडीट गुनंकात भरपूर सूट देउन प्रोत्साहन दिले होते व श्री जमेस रीग्ग यांनी आनंदाने मार्गदर्शनाचे आव्हाहन स्वीकारत असल्याचे पत्र पाठविले होते. आज यामुळेच ज्योतिष शास्त्रास ४८ टक्के अमेरिकन्स ,व ४० टक्के जागतिक लोकसंखेचे पाठबळ आहे.
आज गरज आहे ती शास्त्रज्ञ ,व भारतीय बुद्धिवादी यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची कारणभारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त व्यापक ,सूक्ष्म तरं आहेच पण त्याची उभारणी व मांडणी भक्कम सामाजिक ,धार्मिक व आध्यात्मिक पायांवर रचली गेली आहे. आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला गेला नाही तरं आज फक्त भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.
डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.
drsanjayhonkalse@gmail.comhttp://drsanjayhonkalse.tripod.com

५ ऑगस्ट, २०१०

गौरव ज्ञानाचा


काही व्यक्ती या वयाने लहान असल्यातरी आपल्या ज्ञानाने अतुच्य शिखर गाठतात . अशी अनेक उदाहरणे आपण ऐललेली आहेत पाहिलेली आहेत. आज अशाच एका व्यक्तिमत्वाची ओळख करुन देतो. श्री. वरदविनायक खांबेटे. माझे सर ज्यांचाकडे मी कृष्णमुर्ती ज्योतिष पध्दत शिकलो. वयाने साधारण तिशीच्या आतले.

नुकताच त्यांना 'फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्यातर्फॅ 'ज्योतिर्रविद्यावाचस्पती' हा अतुच्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मेडिकल अ‍ॅस्टॉलोजी संबंधीत सादर केलेल्या संशोधनास त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. आजपर्यंत हा पुरस्कार मिळालेल्यात वरद सर हे सगळ्यात कमी वयाचे आहेत.

या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. मी माझे भाग्य समजतो की अशा ज्ञानतपस्वीकडून मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली.

श्री वरद सरांना त्यांनी योजलेल्या सर्व कामात यश मिळो ही गुरुचरणी प्रार्थना. तसेच त्यांचा कवितासंग्रह ही लवकरच वाचावयास मिळावो या शुभेच्छा !!

अमोल केळकर

८ जुलै, २०१०

' ऑक्टोपसच्या अंतरंगात'

सध्या मी माझ्या ब्लॉगचे नाव 'भविष्याच्या अंतरंगात ' बदलण्याचा विचार करत आहे. ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' किंवा असेच काहीसे . आपणास आणखी काही सुचत असल्यास कृपया कळवावे।


सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे। स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे अस्तो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्‍या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले।




चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्‍या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.

२४ जून, २०१०

म्हैस आणि टाईम्स

महाराष्ट्र टाईम्स मधे ( रविवार १३ जून २००९ ) रोजी माझे चुलत अजोबा श्री दामुअण्णा केळकर यांच्याबद्दलच्या आठवणी श्री। सुभाष भेंडे यांनी लिहिल्या होत्या. तो लेख इथे देत आहे. आम्ही लहान असतानाच अजोबांचे निधन झाले. त्यांच्याशी निगडीत आठवणी तशा नाहीतच. मात्र त्यांची मुर्ती अजुनही डोळ्यासमोर आहे. या लेखाच्या निमित्याने त्यांच्या संबंधीत हा लेख माझ्या ब्लॉगवर चढवून त्यांना आदरांजली !

अमोल

-----------------------------------------------------------------------------------------

केळकर सरांचं घर त्या व्यायामशाळेजवळ होतं. तास संपवून ते घरी जायचे आणि डोकीवरला रूमाल काढून कोट घरी ठेवून व्यायामशाळेजवळ घोटाळायचे. उघडेबोडके, धोतराचा काचा मारलेला. उजव्या हातात एक काठी आणि डाव्या हातात 'टाइम्स ऑफ इंडिया'! कुरणावर दोन म्हशी शांतपणे चरत असलेल्या... ... वयाची नऊ ते सोळा वर्ष सांगलीच्या 'सिटी हायस्कूल'मध्ये होतो. माणसाच्या आयुष्यातली ही महत्त्वाची वर्षं! या वयात मिळणाऱ्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरते. ओल्या मातीला या काळात आकार दिला जातो. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण याच कोवळ्या वयात होते. अनेक शिक्षक वेगवेगळे विषय शिकवत असतात. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी, वेशभूषा वेगळी, बोलण्या-चालण्याची लकब वेगळी! पण या सगळ्यांत मला प्रकर्षानं आठवतात, ते दामुअण्णा केळकर सर! वेष अगदी साधा! पांढरा सुती सदरा, त्यावर निळा कोट, दुरांगी धोतर आणि डोईला गुंडाळलेला रूमाल. पायात कोल्हापुरी वहाणा।
आम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे आवाजाचा प्रतिध्वनी कसा उमटतो हे शिकवताना त्यांनी प्रश्न केला, 'गोलघुमट कुणी पाहिलाय का?' मी उभा राहिलो. 'मी पाहिलाय सर।' '
शाबास! विजापूरला जाऊन पाहिलास की, चित्रात?' 'चित्रात नव्हे. मी विजापूरला गेलो होतो एकदा आईबाबांच्या बरोबर,' मी छाती फुगवून सांगितलं. सर्व मुलं थक्क! जणू विजापूर म्हणजे पॅरिस, रोम! '
तिथं भिंतीला तोंड लावून कुजबुजलास की नाही?' 'हो तर! घुमटाच्या एका बाजूला भिंतीला तोंड लावून कुजबुजलो. खूपच दूर दुसऱ्या बाजूला बहिणीनं भिंतीला कान लावला होता. तिला सगळं स्पष्ट ऐकूआलं. मग ती कुजबुजली आणि मी स्पष्ट ऐकलं.' 'शाबास! ध्वनी-प्रतिध्वनीचे हे उत्तम उदाहरण आहे,' त्यांनी विषय पुढं शिकवला।
दोन दिवसांनी आमचा इंग्रजीचा वर्ग चालू होता. शिपायानं येऊन सांगितलं, 'पलिकडच्या वर्गात केळकर सर तुला बोलवताहेत.' मी भीत भीत त्या वर्गात शिरलो. केळकर सर त्या तुकडीत ध्वनी-प्रतिध्वनीचा विषय शिकवत होते. आमच्या वर्गात गोलघुमटाविषयी जी प्रश्नोत्तरं झाली तीच पुन्हा त्या वर्गात झाली! आणि पुढल्या आठवड्यात तिसऱ्या तुकडीत तीच प्रश्नोत्तरं! गोलघुमटावरची अधिकारी व्यक्ती म्हणून माझी शाळेत ख्याती झाली. केळकर सरांना केवळ भौतिकशास्त्र येत होतं, असं नव्हे. कोणताही विषय त्यांना र्वज्य नव्हता. कधी एखाद्या विषयाचे शिक्षक गैरहजर असत. कॉलेजमधले प्राध्यापक गैरहजर असले की, मुलं बाहेर उंडारायला मोकळी! शाळेत ते नाही चालत. ऑफ पिरियडला दुसरे शिक्षक येत. मुलांना कथा सांगत, गाण्याच्या भेंड्या घेत. कधी येताना साठ-सत्तर पुस्तकंं आणत. मुलांना चाळीस-पंचेचाळीस मिनिटं ती वाचायला मिळत. मात्र केळकर सर आले की मुलांना प्रश्न करीत, 'कसला तास आहे?' 'जॉमेट्रीचा,' कुणीतरी सांगे. 'कोणते प्रमेय शिकता आहात?' 'पायथॅगोरसचं.' 'असं? मग वह्या उघडा. ते प्रमेय आपण नीट समजावून घेऊ. तर त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज...' आणि मग घंटा होईपर्यंत पायथॅगोरसचा सिद्धांत! कधी मराठीचा तास ऑफ असायचा. केळकर सर आले की, मनात यायचं, 'हे सायन्सचे सर. एकवेळ त्यांना अल्जेब्रा-जॉमेट्री येईल. भाषा विषय कसा येणार?' पण त्यांनी मराठीच्या तासाला केशवसुतांची 'झपुर्झा' उत्तम शिकवली. 'कंटकशल्ये बेथटरी! मखमालीचा लव उठवली! काय म्हणावे या स्थितीला।. झपुर्झा, गडे झपुर्झा।' ते इतके रंगून गेले होते की, आमच्या अंगावर काटा आला. केशवसुतांच्या बाकीच्या कविता सहज म्हटल्या त्यांनी. संपूर्ण केशवसुत मुखोद्गत होता त्यांना. संस्कृतच्या पिरियडला त्यांनी कालिदासाचं 'शांकुतल' शिकवलं, इतकं तन्मय होऊन की, 'हरिणशावकानं शकुंतलेच्या पदराचं टोक तोंडात धरलं, तेव्हा शकंुतला हळुवारपणे तक्रार करू लागली. कशाला माझ्या पदराला बिलगतंय?' हे वाक्य उच्चारताना सरांनी कोटाचं टोक ओढून धरीत मागं नजर टाकली! प्रत्यक्ष शकुंतलेला तरी इतका हळुवार आविर्भाव जमला असता की, नाही कोण जाणे!
आम्हाला आठवड्यातून दोनदा शारीरिक शिक्षणाचा तास असायचा. शाळेपासून पाचसहा मिनिटांच्या अंतरावर व्यायामशाळा होती. तिथं नातू सर सिंगलबार, डबलबार, मल्लखांब, कुस्ती शिकवायचे. कवायती घ्यायचे. केळकर सरांचं घर त्या व्यायामशाळेजवळ होतं. तास संपवून ते घरी जायचे आणि डोकीवरला रूमाल काढून कोट घरी ठेवून व्यायामशाळेजवळ घोटाळायचे. उघडेबोडके, धोतराचा काचा मारलेला. उजव्या हातात एक काठी आणि डाव्या हातात 'टाइम्स ऑफ इंडिया'! कुरणावर दोन म्हशी शांतपणे चरत असलेल्या. टाइम्स वाचता वाचता केळकर सर म्हशींवर लक्ष ठेवून असायचे! त्या बिचाऱ्या त्यांच्या शिस्तीत वाढलेल्या. इकडे तिकडे न भरकटता संथपणे कोवळं गवत फस्त करायच्या. सरांचा टाइम्स वाचून झाला की, म्हशी घराकडे कूच करायच्या. सर चहा-कॉफी घेत नसत. पहाटे उठून स्वत: म्हशीच्या धारा काढत. जोर-बैठका झाल्यावर धारोष्ण दूध पीत. शरीर गोटीबंद. सिंगलबार, मल्लखांब सहज येता जाता करायचे. पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर यायचा. उसळणाऱ्या पाण्यात पुलावरून उड्या मारणं, हा सांगलीकरांचा आवडता छंद. मुलांची, तरुणांची अमाप गदीर्! गदीर्च्या अग्रभागी केळकर सर धोतराला काचा मारून उघड्या अंगानं तासन्तास पोहत राहायचे. माझ्यासारखी भित्री मुलं काठावरून मजा पाहत उभी राहिली की, ते ओरडायचे, 'नुसते बघत काय राहिलात! काढा कपडे आणि मारा उड्या!' आम्हाला तेवढं धैर्य कुठं? आम्ही हळूच तिथून काढता पाय घ्यायचो!
सांगली सोडूनमी पुण्याला आलो. सात-आठ वर्षांनी अचानक केळकर सर भेटले. मुंबईला गेलो होतो. पुण्याचा रेल्वेचा पूल ओलांडताना समोरून सर येताना दिसले. हातात भली मोठी पत्र्याची ट्रंक, पण ती सहज पेलत चालले होते. 'कुठं निघालात सर?' 'सांगलीला, तुझं कसं चाललंय?'
'उत्तम. मुंबईला गेलो होतो।' '
सामान दिसत नाही।' '
कुलीकडे दिलंय' छोटी सुटकेस घेऊन येणाऱ्या हमालाकडे अंगुलीनिदेर्श करत मी म्हटलं। '
कुलीकडे का? वा छान!' हातातली अवजड ट्रंक सावरीत ते निघून गेले।
मी मुकाट्याने कुलीमागून धावू लागलो. बराचसा शरमिंदा होऊन!
बऱ्याच वर्षांनंतर सांगलीला गेलो होतो. केळकर सर आजारी असल्याचं कळलं, म्हणून मुद्दाम त्यांना भेटायला गेलो. पडल्या पडल्या ते जी. एं. च्या कथा वाचत होते. पाचदहा मिनिटं गप्पा झाल्यावर त्यांनी विचारलं, अजून हमालाकडे बॅग देतोस की स्वत: उचलतोस?'
'त्या दिवसापासून स्वत:च।'
'ठीक ठीक! स्वत:चं काम स्वत: करावं।
अरे, अब्राहम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष झाला, तरी स्वत:चे बूट स्वत: पॉलिश करायचा'
तीच त्यांची अखेरची भेट...

------------------------------------------------------------------------------------------

१२ जून, २०१०

४ जून, २०१०

२७ ऑगस्ट २०१०

एका पुढे ढकललेल्या इ पत्रातून ही माहिती मिळाली आहे। २७ ऑगस्ट २०१० ला मंगळ हा पृथ्वीच्या अतीशय जवळ येणार आहे. त्यादिवशी पहाटे १२.३० वा ( म्हणजे बहुतेक २६ ऑगस्ट ला रात्री) चंद्र आणि मंगळ आकाशात खूप जवळ दिसतील. मंगळाचा आकार एवढा मोठा असेल की जणू दोन चंद्र आकाशात आहेत असा भास होईल।


खगोल शास्त्रज्ञ ( जाणकार ) यावर अधिक भाष्य करु शकतील.
पावसाळ्याच्या या दिवसात आकाश निरभ्र रहाण्याची शक्यता कमी असताना बघु या हा निसर्गाचा अनोखा अविष्कार आपल्याला पहायला मिळतो का ते?


अमोल केळकर

२९ एप्रिल, २०१०

ज्योतिष हे शास्त्रच, बंदी अशक्य!

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी ( दुवा पाहण्यासाठी इथे टिचकी मारा )
------------------------------------------------------------------------------------------------

ज्योतिष हे प्राचीन 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मुंबई हायकोर्टात एका प्रतिज्ञापत्राद्वारे घेतली आहे. जनहित मंचचे भगवानजी रैय्यानी यांनी जनहित याचिका केली असून त्यांनी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व काही अंधश्रद्धांविरोधात दाद मागून 'ड्रग व मॅजिक अॅक्ट, १९५४' या अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर केंदीय ड्रग कंट्रोलर डॉ. पी. रामकृष्ण यांनी प्रतिज्ञापत्र करून त्यात ज्योतिषशास्त्र हे चार हजार वषेर् जुने शास्त्र असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित असल्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टानेही घटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेत हतक्षेप करता येत नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय 'ड्रग आणि मॅजिक रेमेडिज अॅक्ट'मध्ये ज्योतिषशास्त्र येत नाही, असे म्हटले आहे. हा कायदा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लागू आह, असे स्पष्ट केले आहे. 'हे स्युडो सायन्स' याबाबत रैयानी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात ज्योतिषशास्त्र हे 'स्युडो सायन्स' (फसवे शास्त्र) असल्याचे म्हटले असल्याचा दावा केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील काही विद्यापीठांमध्ये ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता, त्याला डॉ. भार्गव यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाकडे आव्हान दिले. ती याचिका फेटाळली होती. त्याविरोधात ते सुप्रीम कोर्टात गेलेे. तेथे कोर्टाने आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्याचे व अद्याप निर्णय झालेला नसल्याने याचिका अपरिपक्व असल्याचे नमूद करीत याचिका निकाली काढली होती.

२४ एप्रिल, २०१०

सचिनला शुभेच्छा !!

आपल्या लाडक्या सचिनला ३७ व्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!

आयपीलचा अंतीम सामन्यात त्याला खेळता यावे हीच सदिच्छा !!


अमोल

२४ मार्च, २०१०

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !!



”दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा
पुरतो मारूतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्।

२७ फेब्रुवारी, २०१०

माझ्याही शुभेच्छा -

२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ' जेवढे शक्य असेल तेवढे आपण एकमेकांशी ( मराठी माणसाशी ) मराठीतून बोलू , मराठीतून पत्रव्यवहार करु आणि मराठी भाषा समृध्द करण्याचा प्रयत्न करु !!

आपला
अमोल केळकर
नवी मुंबई, बेलापूर

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या