२३ मे, २०११

श्री व्यंकटेशस्तवन !!!!

व्यंकटेश हे नाम चांगले ! म्हणुनि आवडी चित्त रंगले !
ध्यान मानसीं लागली स्तुती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! १ !!

व्यंकटेश हे स्वामी राजसा ! पावसी मला हाचि भरंवसा !
क्षणाक्षणा तुझी मांडली स्तुती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! २ !!

व्यंकटेश हे कुळदैवता ! तूंचि माउली सद्गुरु पिता !
इष्ट मित्र तूं धनाढ्य संपत्ती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ३ !!

व्यंकटेश रे तूजवेगळें ! दीन शीणतो दाविं पाउलें !
विश्वचालका भाकितों किती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ४ !!

कमलजापती कमललोचना ! नाभिकमलही भक्तदर्शना !
भक्तवत्सल ब्रीद साधती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ५ !!

दुष्ट दुर्मती दैत्य मारिले ! अपार संकटी भक्त तारिले !
आजि कां तरी सांडली रिती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ६ !!

ह्रुदय फूटला कंठ दाटला ! म्हणुनि लोचनीं पूर लोटला !
अजुनि अंत गा पाहशी किती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ७ !!

साधना तरी काय मी करूं ! भक्ति कोणती सांग आचरूं !
तीर्थही बहू हिंडलों क्षितीं ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ८ !!

लक्ष्मीपती छंद लागला ! स्वामी संकटीं शीघ्र पावला !
भेट दीधली कृष्णजीपती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ९ !!

श्री व्यंकटेशा किती चाळवीसी ! तुझी पादपद्में कधिं दाखवीसी !
तुझ्या भेटिची आस मोठी जिवाला ! कधी भेटसी व्यंकटेशा दयाळा !! १० !!

मुरारी जगन्नाथ नारायणा हो ! कृपासागरा अच्युता माधवा हो !
मधूसूदना श्रीधरा भाग्यवंता ! नमस्कार हा व्यंकटेशा समर्था !! ११ !!
* * * * * * * * * ** * * * * ****** * * * * * * ** * * * * ** * * * *
व्यंकटाद्रिसमं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचन !
व्यंकटेशसमो देवो न भूतो न भविष्यति !!

१९ मे, २०११

गुरु स्थान - फळाचा परिणाम

जन्मे लग्ने गुरुश्चैव रामचंद्रो वनागतः !
तृतीये बळी पाताळे चतुर्थे हरिश्चन्द्रयो: !
षष्ठे द्रौपदी हरणंच हन्ति रावणमष्टमे !
दशमे दुर्योधनं हन्ति द्वादशे पांडु वनागतम् !

'गुरु' पत्रिकेत ज्या स्थानात असतो ते स्थान ज्या गोष्टींचे कारक आहे त्यासंबंधी वाईट फळ मिळते. मात्र गुरुची दृष्टी ( ५,७,९ ) ही चांगली असते. वरील श्लोक हेच स्पष्ट करतो.
जन्म लग्नी कर्कॅचा गुरु होता म्हणून रामाला वनवासात जावे लागले. तृतीयातील गुरुने बळीला पाताळात दडपले, हरिश्चंद्राला ४ थ्या स्थानातील गुरुने वनवास घडला, ६ व्या स्थानातील गुरुने द्रौपदीचे वस्त्रहरण घडले. अष्टमातील गुरुने बलाढ्य रावणाचा नाश झाला. दुर्योधनाच्या दशमातील गुरु- माता पित्यांसमोर मृत्यू. भिष्माचार्यांच्या १२ व्या स्थनी गुरु( मकरेचा ) होता. राज्याभिषेक झाला नाही. दशरथाला ५ व्या स्थानी गुरु म्हणून पुत्र् -पुत्र म्हणून मरावे लागले. विश्वामित्राच्या ९ व्या स्थानात कर्केचा गुरु - कुत्रा व्हावे लागले.

४ एप्रिल, २०११

शुभेच्छा

या ब्लॉगचे सर्व वाचक, हितचिंतक , जातक , तसेच समस्त मित्र परिवार, नातेवाईक यांना गुढीपाडवा तसेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा


३ एप्रिल, २०११

अभिनंदन !!! - जिंकलो ते जिंकलो







यस वी आर द किंग्ज !! किंग्ज ऒफ कप !!
धोनी ब्रिगेड चे अभिनंदन




या एका खेळीने तू सर्वांची तोंडे बंद केलीस ! एक अप्रतीम खेळी ! आणि तो शेवटचा षटकार !
तर क्या बात है

जिंकावे तर किंग स्टाईलने




परत एकदा सर्व संघाचे अभिनंदन




















३० मार्च, २०११

' द वेन्स्डे '

मोहालीतील आज भारत विरुध्द पाकिस्तान हा अत्यंत प्रतिष्ठेच्या सामना / युध्द रंगणार आहे. संपुर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे आहे. या सामन्यातील विजेताच खर्‍या अर्थाने विश्वकपाचा राजा म्हणजेच ' द किंग ऑफ कप ' ठरणार यात शंका नाही

भारतीय संघास विजयासाठी तसेच मास्टर ब्लास्टर सचिनला त्यांच्या १०० व्या शतकासाठी अनेक शुभेच्छा


----------------------------------------------------------------------------------------------


Sydney 1992 FAKR HAIN..


Banglore 1996 FAKR HAIN...


Old Trafford 1999 FAKR HAIN..


Centurion 2003 FAKR HAIN..


Johannesburg 2007 FAKR HAIN..


..... They hav asked many qsns on Friday, repeated on Tuesday and like always we will reply on A WEDNESDAY!!!!


( साभार - इमेल)



१५ मार्च, २०११

श्री महाकाली मोहिनी कवच

हे कवच रोज सकाळी व रात्री म्हणावे, यामुळे शत्रुनाश होतो व विरुध्द बाजुची व्यक्ती आपल्याला अनुकूल होऊन तिचा विरोध मावळतो

दशवक्रा दशभुजा दशपादांजन प्रभा
कोटीसूर्य प्रभाकाली मम शत्रून विनाशय
नाशयित्वां क्षणं देवि अन्य शत्रून विनाशय
क्रीं क्रीं क्रीं उग्र प्रभे विकट दन्ष्ट्रे
पर पक्षं मोहय मोहन पचपच मथ मथ
दह दह हन हन मारय मारय ये मां
हिंसतु मुद्दता योगिनी चैक्रस्तान
वारय वारय छिंधीं छिंधीं भिंधीं भिंधीं
करालिनी मृण्ह मृण्ह ॐ क्रिं क्रिं क्रिं
स्फुर स्फुर पुन पुन चुल्ब चुल्ब धक धक
धम धम मारय मारय जगदवशमानव
ॐ नमः स्वाहा

११ मार्च, २०११

कर्जमुक्ती साठी गणपतीस्तोत्र !!

अथ ऋणमुक्तिगणेशस्तोत्रम् !!

अथ श्रीऋणविमोचन महागणपतीस्तोत्रमंत्रस्य शुक्राचार्य ऋषी: , ऋणवोमोचनमहागणपतिर्देवता, अनुष्टुप् छन्दः, ऋणविमोचनमहागणपतिप्रीत्यर्थं जपे विनियोगः !!
ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलम् !
षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये !! १ !!
महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम् !
एकमेवाद्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये !! २ !!
एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्म सनातनम् !
महाविघ्नहरंदेवं नमामि ऋणमुक्तये !! ३ !!
शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगन्धानुलेपनम् !
सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये !! ४ !!
रक्तम्बरं रक्तवर्णं रक्तगन्धानुलेपनम् !
रक्तपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये !! ५ !!
कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगन्धानुलेपनम् !
कृष्णयज्ञोपवीतंच नमामि ऋणमुक्तये !! ६ !!
पीताम्बरं पीतवर्ण पीतगन्धानुलेपनम् !
पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये !! ७ !!
सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनम् !
सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये !! ८ !!
एतद् ऋणहरं स्तोत्रं त्रिसन्धं यः पठेन्नरः !
षणमासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशयः !! ९ !!
सहस्त्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत् !
इति रुद्रयामले ऋणमुक्तिगणेशस्तोत्रं सम्पूर्णम् !! १० !!
वरील स्तोत्र मंगळवारी सुरवात करुन रोज सकाळी १ वेळा तरी म्हणावे . हमखास कर्जफेड होते. घेतलेले कर्जाचे पैसे मंगळवारीच द्यावेत.

८ मार्च, २०११

अभिनंदन

डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाचा ' महाराष्ट्र भूषण ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे
त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन

खगोलशास्त्रातील संशोधनात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

अमोल केळकर

२ मार्च, २०११

महाशिवरात्री


शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको
तीर्थासि जाऊ नको !
योगाभ्यास नको व्रते मख नको
तीव्र तपें तीं नको !
काळाचें भय मानसीं धरु नको
दुष्टांस शंकूं नको !
ज्याचीया स्मरणें पतीत तरती
तो शंभु सोडूं नको



द्वादशज्योतिर्लिंङानि - स्तोत्र
-------------------------------------------------
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् !
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम !! १ !!
परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् !
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने !! २ !!
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे !
हिमालये तु केदारं घुसृणेशं शिवालये !! ३ !!
एतानि ज्योतिर्लींङानि सायं प्रातः पठेन्नरः !
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति !! ४ !!

२३ फेब्रुवारी, २०११

गण गण गणात बोते

दि. २४ फेब्रुवारी २०११, श्री गजानन महाराज प्रकट दिन


मराठी विकिपिडीयात मिळालेली काही माहिती
माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव
जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
"कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति आलीसे प्रचिती बहुतांना "

जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदारभव्य छाती दृष्टी स्थिरभृकुटी ठायी झाली असे." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घरझाले असे पंढरपूरलांबलांबूनीया दर्शनास येतीलोक ते पावती समाधान," बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले.

"गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करीत. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्यजीव हा ब्रह्मास सत्यमानू नको तयाप्रतनिराळा त्या तोची असे." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला , मलकापूर , नागपूर , अकोट , दर्यापूर , अकोली - अडगाव , पिंपळगाव , मुंडगाव , रामटेक , नांदुरा , अमरावती , खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश : धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक - त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे - सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती . महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत . ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत . नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले ढळतात
लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते.जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे तसेच त्यांना खूप दूरहीलागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य ही भगवदगीतेवर टीका लिहिली. "गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाया मी समर्थ नसे," अशा स्तुतिपर शब्दात दासगणूंनी टिळकांचा गौरव केला आहे.

काही उपयुक्त संकेतस्थळ ( श्री गजानन विजय चे अध्याय खालील संकेत्स्थळावर मिळू शकतील )
http://balsanskar.com/marathi/lekh/cid_125.html

५ फेब्रुवारी, २०११

गणेश जयंती - (माघ शुध्द चतुर्थी )

-गणेश चतुर्थी प्रमाणे गणेश जयंतीचा ही उत्सव साजरा केला जातो. विशेषतः कोकणातही मोठ्या प्रमाणात हा उत्सव होतो. यंदा ७ फेब्रुवारीला ही गणेश जयंती आहे यानिमित्याने ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर - यांचा महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला ( २ फेब्रूवारी २०१० ) लेख जसाच्या तसा इथे देत आहे.
शास्त्रांतर्गत गणपतीचे एकूण २४ अवतार सांगितले आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला एक याप्रमाणे १२ महिन्यांचे २४ अवतार झाले. ह्यापैकी २२ अवतारांचा फारसा तपशील उपलब्ध नाही. मात्र भाद्रपद शुध्द चतुर्थी आणि माघ शुध्द चतुर्थी ह्या दोन चतुर्थ्यांचे अवतार विशेष प्रसिध्द आहेत. भाद्रपद शुध्द चतुर्थीला शिवपार्वतीचा पुत्र गजानन गणेश ह्याचा जन्म झाला आणि माघ शुध्द चतुर्थीला कश्यप आणि अदिती या ॠषीदाम्पत्याच्या पोटी 'महोत्कट विनायक' ह्या गणपतीच्या अवताराचा जन्म झाला. हे दोन्ही अवतार लढवय्ये, मुत्सद्दी आणि त्यांच्या त्यांच्या काळात जनमानसाला आनंदाचे उधाण आणणारे असे होते. गणपती हा विषय मोठा गोड आहे. न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद ह्या प्रख्यात पंडितांनी एकेठिकाणी असे म्हटले आहे की, 'श्रीगणेशाचे चरित्र विशाल समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखे अथांग आणि विस्तीर्ण आहे. आपल्याला गणपतीबद्दल जे ज्ञान झाले आहे ते त्यातल्या वाळूच्या एका कणाएवढे आहे.' न्यायरत्न विनोदांसारख्या प्रख्यात अधिकारी पंडित पुरुषाने जे उद्गार काढले ते सार्थ ठरतील अशाप्रकारे गणपतीचे स्वरुप लोकमानसात निरंतर चढते-वाढते असे आहे. गणपतीविषयी संशोधित पुस्तके प्रतिवर्षी निघत असतात. परदेशातही गणपतीबद्दल खूप मोठे कुतुहल आणि औत्सुक्य आहे. गणपतीच्या चरित्राची एक खासियत अशी की, तुम्ही कोणताही विषय काढा त्याचा गणराजाशी संबंध जोडून दाखविता येतो. कारण रणांगणात सेनापती पद कुशलतेने सांभाळणारा हा वीरपुरुष नृत्य-गायनातही रस घेतो, गोडधोड आनंदाने खातो, नवी लिपी निर्माण करतो, व्यासांसारख्या महाकवीने लिहिलेले 'महाभारत' लीलया लिहून घेतो आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात आपल्या केवळ दर्शनाने आनंदाचे भरतें आणतो. आपल्याकडचे देव हे खरेच होऊन गेले किंवा काय? ह्याबद्दल शंका प्रस्थापित केली जाते. खरे म्हणजे, रामाची अयोध्या, कृष्णाची द्वारका आजही दृष्टीस पडतात. आपली परंपरा अशी की जो कोणी नरपुंगव विशेष पराक्रम करीत त्याला आपण देवपदी बसवितो. राम आणि कृष्ण ह्यांना तर अवतारी पुरुष मानतो. गणपतीच्या अवताराबद्दल विचार केला असता महोत्कट विनायकाचे जे उपलब्ध चरित्र आहे ते कोणत्याही प्रकारच्या शंकेला निमंत्रण देणारे नाही. त्याने केलेले पराक्रम अद्भुत असले तरी शक्य कोटीतील वाटतात. त्याचा विशाल दृष्टिकोन आपल्याला आकर्षित करतो. मात्र शिवपार्वतीचा नंदन गजानन गणेश ह्याबद्दल त्याच्या जन्मापासूनच काहीसे गूढरम्य असे वातावरण आहे. त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या कथा ह्यानंतर रचलेल्या असतील, असे वाटू शकते. अर्थात, हा विचार अलीअलीकडच्या पिढयांना सुचला असणार हे उघड आहे. पूर्वी देवांच्या चरित्राबद्दल चिकित्सक वृत्ती दाखविणे हे शिष्टसंमत नव्हते. आता मात्र प्रत्येक ठिकाणी माणसे चिकित्सक पध्दतीने विचार करतात आणि साध्या साध्या गोष्टीचाही कीस पाडतात. दोन्ही अवतारातील गणपतीच्या अस्तित्वाची प्रचिती, त्याच्या कृपाछत्राची शाश्वती, त्याच्या भक्तांना वाटत असतेच आणि बहुसंख्य लोक गणपतीचे हे दोन्ही अवतार, त्याची दोन्ही रुपे एकच आहेत, असे समजून चालतात. अध्यात्माच्या विषयात शिवपार्वतीनंदन गजानन गणेश हा मार्गदर्शक आहे. तर ऐहिक जीवनात मिळवावयाच्या सुखसोयीबद्दल आणि आनंदाबद्दल महोत्कट विनायक हा जास्त प्रभावी असा आहे. आपण गणनायक, विनायक, गजानन, गजमुख ही सर्व नावे गणपतीला उद्देशून वापरतो. पण शिवपार्वतीचा पुत्र गजानन गणेश हा गजमुख म्हणजे हत्तीचे शिर असलेला आहे, ह्याबद्दल वाद नाही. मात्र महोत्कट विनायक हा गजमुख गजाननाचे तोंड असलेला असा त्याचा उल्लेख असला तरी त्या गजमुखाची उत्पत्ती सांगणारी कथा सर्वमान्य स्वरुपात उपलब्ध नाही. कित्येक संशोधक महोत्कट विनायक हा हत्तीच्या डोक्याची ढाल करुन युध्दभुमीवर वावरत होता, असे समजतात. कित्येकजण महोत्कट विनायक ह्या देवांच्या सेनापतीचे रणांगणावरील ध्वजचिन्ह गजमुख होते, असेही सांगतात. पण शिवपार्वतीचा नंदन गजानन गणेशाच्या विषयात जशा कथा आहेत तशा माघ शुध्द चतुर्थीला जन्मलेला महोत्कट विनायकाच्या बाबतीत उपलब्ध नाहीत आणि विशेष गोष्ट अशी की ह्या गजमुखाबद्दल जास्त प्रमाणात रुढ असलेली कथा म्हणजे जगन्माता पार्वतीने आपल्या देहावरील मळापासून तयार केलेली मूर्ती, तिचा शिवशंकाराने केलेला शिरच्छेद, मग त्या धडाला लावलेले गजमुख असा सगळा क्रम सुसंगतपणे मांडलेला असला तरी गजमुखासंबंधी अनेक ठिकाणी अनेक लोककथा आणि दंतकथादेखील रुढ आहेत. आपल्या गजानन गणेशाचे एक रुप म्हणता येईल असे लंकेत 'कतरगाम' नावाचे दैवत आहे. त्या देवतेचा कोप झाला तर आपल्यावर संकट ओढवेल म्हणून तिला सगळेच घाबरतात. दंतकथेप्रमाणे हा देव एक कुमार नावाचा भारतीय राजा होता. त्याचा भाऊ गणपती. एकदा हे दोघे शिकार करण्यासाठी म्हणून जंगलात गेले असता तिथे कुमार राजा एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला. पण ती त्याच्याशी लग्न करण्यास राजी होत नव्हती. म्हणून कुमार राजाने तिला हत्तीची भीती वाटते हे समजल्यावर गणपतीला हत्तीचे रुप घेऊन तिच्यासमोर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणपतीने हत्तीचे रुप धारण करण्यापूर्वी कुमार राजाला एक जलपात्र देऊन ती तरुणी लग्नाला झाल्यावर त्या पात्रातील पाणी आपल्यावर शिंपडण्यास सांगितले. त्या पात्रातील पाण्यामुळे गणपतीला आपले मानवी रुप परत मिळणार होते. अपेक्षेप्रमाणे पुढे घडले पण चुकून त्या पात्रातील पाणी सांडले. त्यामुळे गणपतीला गजमुख असलेल्या रुपातच राहावे लागले. अर्थात यामध्ये डावी सोंड आणि उजवी सोंड यांचा संबंध येत नाही. डाव्या सोंडेच्या गणपतीला अधिक प्रमाणात भजले जाते आणि उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल जनमानसात थोडीशी धास्ती असते. अर्थात ही धास्तीसुध्द भ्रामक आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त भारताच्या इतर भागात जेथे जेथे गणेशपूजन विशेषत्वानें केले जाते तेथे तेथे उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल अशी धास्ती दिसून येत नाही. महाराष्ट्रात मात्र उजव्या सोंडेचा गणपती म्हटले की लोक थोडे टरकतातच. उजव्या सोंडेच्या गणपतीला 'सिध्दिषवनायक' म्हणतात. हा बहुधा 'सिध्दि-बुध्दि' या त्याच्या पत्नींबरोबर असतो. पैकी सिध्दि ही सर्वप्रकारचे यश आणि समृध्दी देणारी आहे आणि बुध्दि ही प्रतिभा देणारी, मनःशांती देणारी आणि बिकट प्रसंगी अचूक मार्गदर्शन करणारी अशी म्हणजेच बुध्दिदात्री आहे.

१० जानेवारी, २०११

नवग्रह स्तोत्र


जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् !
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् !!

----------------
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् !
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम् !!
--------------------
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् !
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् !!
-------------------------
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् !
सौम्यं सौम्य्गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् !!
----------------------

देवानांच ऋषीणांच गुरु कांचनसन्निभम् !
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् !!
---------------------
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परम्म गुरुम् !
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् !!
---------------
निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् !
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् !!
--------------------------------

अर्धकायं महाविर्यं चंद्रादित्य विमर्दनम् !
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् !!
----------------------

पलाशपुष्पसंकाशं तार्काग्रह मस्तकम् !
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् !!


इतिव्यासमुखोद्गितं यः पठेत सुसमाहितः !
दिवा वा यति वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यते !!

नरनारी नृपाणांच भवेत् दु:स्वप्ननाशनम् !
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् !!
ग्रहनक्षत्रजा: पीडास्तस्कराग्निसमुद्भवा: !
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशयः !!
इति श्री व्यासविरचितम् !
आदित्यादि नवग्रहस्तोत्रं संपूर्णम् !!

७ जानेवारी, २०११

काही तोडगे -उपाय

आजारीपण-

एखादे वेळी घरातील व्यक्ती फार आजारी होते. औषध पाण्याचा काहीच गुण येत नाही व त्याच्या जीविताबद्दल काळजी वाटू लागते. अशावेळी करावयाचा तोडगा-सकाळी स्नान झाल्यावर देवासमोर बसुन २७ वेळेला गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर एक पाट पुढे मांडून त्यावर दुधाने पाऊण भरलेला पेला ठेवावा व त्यावर हात ठेवून ओम चैतन्य अश्विनी कुमाराय नम:... या मंत्राचा १०८ जप करुन
ते दुध आजारी माणसास पिण्यास द्यावे . असे ७ दिवस करावे.

----------------------------------------------------------------------------------------

मुलीचा विवाह -


मुलीने आपल्या पत्रीकेत ज्यावेळी वृषभ राशीत चंद्र येईल त्या दिवसापासून तो कर्क राशीत येईपर्यंतच्या काळात " श्री लक्ष्मीनारायणाय नम:" या मंत्राचा रोज स्नानानंतर १०८ वेळा जप करावा . जप काळात कांदा व लसूण खाऊ नये व परगावी
जाऊ नये. जपकाळातील मंगळवारी एकभुक्त रहावे.रोज रात्री ज़ोपण्यापुर्वी आईला अगर घरातील सुवासिनीला नमस्कार करावा. लाजू नये

संदर्भ - श्रीभविष्य दर्शन मासिक - मे १९७३

३१ डिसेंबर, २०१०

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा

आमच्या सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, हितचिंतक, जातकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा .

आपणा सर्वास येणारे २०११ वर्ष सुखाचे, समाधानाचे , भरभराटीचे जावो. आपले सर्व संकल्प., योजना, अडकलेली कामे पुर्ण होवोत . सगळयात महत्त्वाचे म्हणजे आपणास मानसीक समाधान मिळो या साठी शुभेच्छा !!

नववर्षाचे स्वागत करताना कृपया आपण रस्तावर वाहन चालवताना काळजी घ्या

अमोल केळकर


२० डिसेंबर, २०१०

!! घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकात्त्मक स्तोत्रम !!

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव !
श्रीदत्ता$स्मान् पाहि देवाधिदेव !!
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! १!!
--------------------------------------------------------------
त्वं नो माता त्वं पिता$$ प्तो$ धिपस्त्वम् !
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् !!
त्वं सर्वस्वं नो$प्रभो विश्वमूर्ते
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! २ !!
---------------------------------------------------------------
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं !
भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्वदन्यम् !!
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! ३ !!
---------------------------------------------------------------
नान्यत्राता नापि दाता न भर्ता !
त्वतो देव त्वं शरण्यो$कहर्ता !!
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! ४ !!
---------------------------------------------------------------
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं !
सत्सङ प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् !!
भावासक्तिं चखिलानन्दमुर्ते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! ५ !!
--------------------------------------------------------------
श्लोक पञ्चकमेतद्यो लोकमन्गलवर्धनम् !!
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् !!६ !!
---------------------------------------------------------------
!! इति श्रीमत् परमहंस परिब्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अधोरकष्टोध्दरण स्तोत्रं सम्पूर्णम्

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या