३० नोव्हेंबर, २०११

व्याख्यानमाला -



ब्राह्मण संस्कृती मंडळ, स्वामी विवेकानंदनगर  ( बेलापूर ,  नवी मुंबई )  यांच्या तर्फॅ २ ते ४ डिसेंबर या कालावधीत  श्री विवेक घळसासी यांची  व्याख्यानमाला आयोजीत केली आहे.

हा कार्यक्रम  संध्याकाळी ७ ते ९  या कालावधीत आहे.

स्थळ :  अंबीका योग कुटीर
 सेक्टर ९, बेलापूर, कोकन भवन ( नवी मुंबई)

व्याख्यानमालेतील विषय

१) आर्य चाणाक्यची राजनिती
२) आर्य चाणाक्यची अर्थनिती
३) स्वामी विवेकानंद -  युवा मनाची प्रेरणा

इच्छुकांनी  अवश्य या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा

अमोल केळकर

२५ नोव्हेंबर, २०११

स्थिर चित्त स्तोत्र :-


सध्या आजूबाजूला अनेक विचित्र घटना घडत आहेत. स्पर्धेच्या युगात अनेक अपेक्षा ठेवल्या जात आहेत . दरवेळी  अपेक्षापुर्ती होत नाही . अशावेळी  मन स्थिर रहाणे ही अवघड गोष्ट झाली आहे.  त्यासाठी खालील स्तोत्र उपयोगी पडू शकेल .
-----------------------------------------------------------------------------
मन स्थिर करण्यासाठी जपावयाचे स्तोत्र -

अनसूया अत्रिपासून संजात ! दत्तात्रेया तू महाबुध्दिमंत !
सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात ! माझे चित्त करी स्थिर !! १ !!

शरण आलेल्यांचा जगात ! दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात !
सर्वचालक देवा तू त्वरित ! माझे चित्त करी स्थिर !! २ !!

सर्व मंगलाचे मंगल पावन ! सर्व आधिव्याधींचे औषध महान !
सर्व संकटांचा हर्ता तू शोभन ! माझे चित्त करी स्थिर !! ३ !!

स्मरताक्षणी स्वभक्तांना ! भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना !
भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना ! माझे चित्त करी स्थिर !! ४ !!

सर्व पापांचा क्षय करी !  ताप दैन्य सारे निवारी !
अभिष्टदात्या प्रब्जो तू सावरी ! माझे चित्त करी स्थिर !! ५ !!

जो हे श्लोक पंचक वातील ! नित्यनेमें नियम चित्त निर्मळ !
स्थिर चित्त तो होईल ! भगवतकृपापात्र जगती !! ६ !!

इति श्री - परमहंस - परिवाज्रकाचार्य - वासुदेवानंदसरस्वती - विरचितं  मनः स्थिरीकरण स्तोत्रं संपूर्णम् !!


२४ नोव्हेंबर, २०११

राहू अशुभ काळ



रविवार   : सायं ४. ३० पासून ६.०० पर्यंत
सोमवार  : सकाळी ७.३० पासून  ९.०० पर्यंत
मंगळवार : दुपारी ३.०० पासून ४.३० पर्यंत
बुधवार    : दुपारी १२.०० पासून १.३० पर्यंत
गुरुवार    : दुपारी १.३० पासून ३.०० पर्यंत
शुक्रवार    : सकाळी १०.३० पासून १२.०० पर्यंत
शनिवार    :  सकाळी ९.०० पासून १०.३० पर्यंत

राहू अशूभ काळामधे शक्यतो  सही, प्रवास, महत्वाची कामे, भेटीगाठी टाळावे

२३ नोव्हेंबर, २०११

संत ज्ञानेश्वर समाधी दिन -



माझा मराठाचि बोलू कौतुके।
 परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।



कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८ रोजी संत ज्ञानेश्वर यांनी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली. उद्या २३ नोव्हेंबर २०११ ज्ञानेश्वरांच्या समाधी दिन आहे.  'पसायदान ' ही अवघ्या विश्वाला संत ज्ञानेश्वरांनी दिलेली अमोल देणगी आहे
------------------------------------------------------------------------------------------------------

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज् द्यावे । पसायदान् हे ।।

जेखळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतो परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।

दुरितांचे तिमिर् जावो । विश्र्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो लाहो । प्राणिजात् ।।

वर्षत् सकळ भूमंगळी । ईश्र्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत् भूमंडळी । भेटतु भुता ।।

चला कल्पतरूंचे अरव् । चेतना चिंतामणीचे गाव् ।
बोलते जे अर्णव् । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन् । मार्तंड् जे तापहीन् ।
ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
भजीजो आदिपुरूखी । अखंडित् ।।

येथे म्हणे श्रीविश्र्वेश्र्वरावो । हा होईल् दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।

१९ नोव्हेंबर, २०११

नियती


त्याचा व्यवसाय असा होता की त्याला दररोज प्रवास करावा लागे. विशेषतः बसचा प्रवास.जेंव्हा जेंव्हा तो असे वाचत असे किंवा ऐकत असे , की अमुक एक बस अमुक एका नदीत पडली, काही लोक बुडाले, काही पोहून काठाशी आले. तेंव्हा तो मनातल्या मनात विचार करी की आता त्याने पोहणं शिकायला हवं . कोणती दुर्घटना कधी घडेल हे सांगता थोडचं येतय ? त्याला तर रात्रंदिवस बसने प्रवास करावा लागतो. पण त्याचा हा विचार दोन तीन दिवसापेक्षा जास्त दिवस टिकत नसे.पोहण शिकण्यास तो टाळाटाळ करत नाही.

त्या दिवशी तो बसने जात होता.बस नदीवरच्या पुलाशी अचानक थांबली. असं कळलं की काही वेळापुर्वीच एक बस नदीत कोसळली. गर्दी जमली होती. बचावकार्य सुरु होतं. पोलीस आले होते. अन्य प्रवाशांप्रमाणे तो ही खाली उतरुन ही भिषण दुर्घटना पाहू लागला. नदीत बुडणा-या, वाहून जाणा-या लोकांकडे पाहून भीतीने त्याचा थरकाप झाला. मनातल्या मनात पोहायला शिकायची त्याने प्रतिज्ञा केली.

दुसर्यादिवशी तो पोहायला शिकायला म्हणून गेला आणि नदीत बुडून मेला.
------------------------------------------------------------------------------------------------------------
’ आवाज आतला बाहेरचाही ’ मधून साभार ( ’अपने अपने सपने’ या घनश्याम अग्रवाल लिखित हिंदी लघुतम कथा संग्रहाचा अनुवाद )

अनुवाद : उज्ज्वला केळकर, सांगली

१८ नोव्हेंबर, २०११

कालभैरवाष्टकम


देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्

व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्


नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं

नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम


कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं

श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम


भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं

भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं


विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


धर्मसेतू_पालकं त्वधर्ममार्ग्_नाशकम्

कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्


स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्

नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्


मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं

दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं

काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्


नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं

ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्


शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्

प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


१४ नोव्हेंबर, २०११

संकष्ट चतुर्थी -सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर २०११

सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१कार्तीक कृष्ण चतुर्थी , संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रात्री वाजून ४९ मिनिटे

१९९७ साली याच संकष्टी चतुर्थी दिवशी ( त्यादिवशीची तारिख होती १७ नोव्हेंबर १९९७) दिवे आगार इथे सुवर्ण णेश प्रतिमा मिळाली होती.

यावेळी दर्शन घेऊयात दिवे आगार येथील सुवर्ण गणेशाचे


१३ नोव्हेंबर, २०११

आवाज आतला बाहेरचाही ’

आवाज आतला  बाहेरचाही
आवाज आतला असतो तसाच बाहेरचाही .....
अर्थपुर्ण आवाजातून शब्द निर्माण होतात आणि
अर्थपूर्ण शब्दातून संवाद, निवेदन.
संवाद, निवेदनातून भाव-भावनांचे कल्लोळ निर्माण होतात
आणि त्यातून कथा प्रकटते.
आतले आवाज स्वत:शीच बोलतात. बाहेरचे
इतरांशी
वेदना - करुणा, दु:ख-आनंद, राग-संताप, चीड-त्वेष असे अनेक भाव व्यक्त करणा-या
जनसामान्यांच्या जिवनाची विविध रंग रुपे चित्रित करणा-या,
मानवी मनाचे विविध पैलू प्रकट करणा-या कथांचा संग्रह






’  आवाज आतला  बाहेरचाही ’
( ’अपने अपने सपने’ या घनश्याम अग्रवाल लिखित हिंदी लघुतम कथा संग्रहाचा अनुवाद )
अनुवाद : उज्ज्वला केळकर, सांगली
प्रकाशक : अक्षता प्रकाशन, पुणे

११ नोव्हेंबर, २०११

११/११/११/ - - ११ वाजून ११ मिनीटे ११ सेकंद


खुप दिवसापासून अनेक जण या दिवसाची वाट पहात आहेत. ११ नोव्हेंबर ११ . अनेकांनी अनेक प्लॅन्स केलेले आहेत. मात्र चर्चा आहे ती आज जन्मणारी मुले. अनेक जणांनी सिझरींग करुन आपल्या बाळास या दिवशी जन्म द्यायची अनैसर्गीक योजना केली आहे. निसर्ग नियमानुसार ही अनेक जण आज जन्म घेतीलच




एक उत्सुकता म्हणून या तारखेची ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंदाची , मुंबई अक्षांश, रेखांशाची पत्रिका काढली आहे. आणि सहजच त्या पत्रिकेतील ठळक गोष्टी पाहिल्या. अभ्यासकही आपले विवेचन करु शकतील

१) आज ११ वा ११ मिनिटानी वाजता ज्यांचा जन्म झाला असेल त्यांची मेष रास असुन नक्षत्र कृतिका असेल . धनु लग्न असेल . (( दुपारे १ वाजून ४३ मि जन्मणार्‍या बालकाची वृषभ रास असेल )

२) लग्नेश गुरु ( वक्री ) पंचमात , गुरु पासून पंचमात मंगळ पापग्रह ( राशी कुंडलीत पंचमात मंगळ )३) पत्रिकेतील काही योग : - गुरु - मंगळ नवपंचम , चंद्र - शनी षडाष्टक, मंगळ - हर्षल षडाष्टक , बुध -शुक्र युती व्ययात
४) सप्तमेश बुध व्ययात , शनी - मंगळाची बुधावर दृष्टी ( राशी कुंडलीतील सप्तमेश शुक्र जो नवमांश सप्तमेश आहे त्यावर ही शनी -मंगळाची दृष्टी)

८) अष्टमेश चंद्र - कृतीका नक्षात्रात

९) दशमात शनी - दशमेश व्ययात
१०) उमेदीच्या काळात राहू महादशा

जाणकार अधीक मार्गदर्शन करु शकतील -

असो आज जन्म घेणार्‍या बालकाना ( ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद ) अनेक शुभेच्छा.

८ नोव्हेंबर, २०११

साडेसाती - काही उपाय


वायफळ बडबड करु नये. गरजेपुरते बोलणे

खोटे बोलणे पुर्णपणे टाळणे

अभिमान, गर्व पुर्णपणे मिटवायचा प्रयत्न करावयाचा

लालसा बाळगायची नाही, कर्म करत रहायचं

शनिवारी आणि अमावस्येला गोडतेलांत तळलेले खाद्यपदार्थ, काळवस्त्र गरिबांना दान करावं.

बुधवारी मारुतीचे दर्शन घ्यावे.

हनुमान वडवानल स्तोत्र किंवा पंचमुखी हनुमान कवच म्हणावे


खालील मंत्र जपावा
ॐ शंशनैश्वराय नमः !

ॐ प्रां प्रीं प्रौ : ॐ शनैश्वराय नमः !



२४ ऑक्टोबर, २०११

धनत्रयोदशी

आपणा सर्वास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा



-------------------------------------------------------------------------------


धनत्रयोदशी बद्दलची काही माहिती इथे वाचा







-----------------------------------------------------------------------------------------------------
ढकलपत्रातून आलेली ही माहिती




वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.


--------------------------------------------------------------------------------------------------

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)

धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झडूची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.




---------------------------------------------------------------------


नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)

आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.
-----------------------------------------------------------------------------------------

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------

पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------

भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.
----------------------------------------------------------------------------------------------------

अमोल केळकर





१५ ऑक्टोबर, २०११

संकष्ट चतुर्थी - १५ ऑक्टोंबर २०११

संकष्ट चतुर्थी - १५ ऑक्टोंबर २०११

चंद्रोदय - ८. २२ मिनीटे

दर्शन घेऊयात जयपूरच्या प्रसिध्द गणपतीचे








पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या