२९ नोव्हेंबर, २०१५

संकष्टी चतुर्थी

श्री  गणेशाय  नम :!


आज संकष्टी चतुर्थी 

 वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या दुस-या भागात  
आज आपण माहिती घेऊ  तासगाव ( जिल्हा :सांगली )   येथील  गणपतीचे .


तासगांवचे गणेश मंदिर व गोपूर
प्रिंट
तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी ( जिल्हा : सांगली )  श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्यांचे प्रसिध्द
सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुमारे २०० वर्षापूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर
गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे.
तासगावचे गणपती मंदिर व त्याचा रथोत्सव भाविकांच्या श्रध्देचा विषय आहे.पशुरामभाऊंनी तासगावला
 उजव्या सोंडेच्या गजाननाचे पंचायतन आणि गोपुरयुक्त मंदिर परिसर असे बांधकाम करण्याचे निश्चित केले.
कर्नाटकातील महादेव शेट्टीबा गवंडी आणि राजस्थानचे चित्रकार यांच्या परिश्रमातून हे गणपती मंदीर १७७९
मध्ये पूर्ण झाले.मंदिराची रचना पाहिली तर पूर्वेचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील नगार खाना, शेजारील रथ गृह,
 लगतच पश्चिम बाजूचे भव्य पटांगण प्रवेशद्वार व त्यावरील
 सात मजली ९६ फूट उंचीचे गोपुर आहे. मुख्य गाभार्‍यात गणपातीची उजव्या सोंडेंची तांबूस गारेची सुबक मूर्ती आहे.
मंदिरची बांधणी दगडी व हेमाडपंथी आहे. सर्व बाजूनी मजबूत अशी तटबंदी,
सुशोभित उद्याने मंदिराची रचना अधोरेखित करते.

गणेश मंदिराच्या बरोबर समोर अर्धा किलो मीटरवर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. मंदेरात दररोज काकड आरती,
 पूजा, दुपारी सायंकाळी आरती व शेजारती होते.तसेच संकष्टी, विनायकी चतुर्थी, सर्व प्रमुख सण,
श्री चा वाढ दिवस व भाद्रपद मास या सर्व दिवशी सायंकाळी श्रीं ची पालखीतून मिरवणूक निघते.
गोंद्गळ्याचे पोवाडे गायन हे त्याचे वैशिष्टय आहे.दरवर्षी श्रावण शुध्द चतुर्थी ते भाद्रपद चतुर्थी
 पर्यत एक महिना देवाचा अभिषेक होतो.
भाद्रपद शुध्द प्रतिपदेपासून श्री च्या वार्षीक उत्सवास सुअरवात होते.रथोत्सवाच्या वेळी गणपती
शंकरास भेटण्यासाठी रथातून जातो.भेट झाल्यानतंर गणपती परत मंदिरात येतो.सांयकाळी श्री ची
महापूजा व प्रसाद वाटप होते.


संकलीत माहिती : माय सांगली.कॉम 
गणेश चित्र साभार : सांगली शिक्षण संस्था  शताब्दी विशेषांक भाग २
संकलन : अमोल केळकर 

२४ नोव्हेंबर, २०१५

सूर निरागस हो. गणपती



सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक. ॐकार गणपती. ॐकार गणपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. लीन निरंतर हो. लीन निरंतर हो... सूर निरागस हो. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया... सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. सूरसुमनानी भरली ओंजळ नित्य रिती व्हावी चरणावर. तान्हे बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सूरातुन. ॐकार गणपती. ॐकार गणपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती. लीन निरंतर हो. लीन निरंतर हो. गणपती. सूर निरागस हो. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया... सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

२३ नोव्हेंबर, २०१५

तुलसी विवाह

तुलसी विवाह — कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो .काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते.त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.

 यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही प्रतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यपुण्यामुळे विष्णूला जालंधराला मारणे अवघड होऊन बसले. तेव्हा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला.हे सर्व वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला. .व ती स्वत; सती गेली. तिच्या मृत्युच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस . म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते. अशीही एक कथा सांगण्यात येते. पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्यावेळेपासून तुलसीविवाहास प्रारंभ झाला असे मानतात. . तुलसी स्तोत्र ——


 तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी | अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम || सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा | द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: || 


 काही मंगलाष्टके -

स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम् । 
बल्लाळं मुरूड विनायक मढं चिंतामणी थेवरम् ॥
लेण्याद्री गिरिजात्मक सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरम् । ग्रामे रांजम संस्थिते गणपती कुर्यात् सदा मंगलम्  ॥ 

 गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा

 कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका 
क्षिप्रा वेत्रवती महा सुरनदी ख्याता ज्या गंडकी 
 पुर्णा पूर्ण जलै : समुद्र सहिता कुर्वंतु वो मंगलम

 रामो राजमणिः सदा विजयते | रामं रमेशं भजे | रामेणाभिहता निशाचरचमू | रामाय तस्मै नमः॥ रामान्नास्ति परायणं परतरं | रामस्य दासोऽस्म्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे| भो राममामुद्धर ||.\

 कुर्यात सदा मंगलम , शुभ मंगल सावधान

 तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव | विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि || || शुभ मंगल सावधान


सर्व माहिती  संग्रहीत 

३० ऑक्टोबर, २०१५

संकष्टी चतुर्थी

श्री गणेशाय नम :! 
 आज संकष्टी चतुर्थी , 
आज पासून दर संकष्टीला गणपती संदर्भात / देवस्थान संदर्भात आणि इतर गणपती संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे . हा उपक्रम आपल्याला आवडल्यास अवश्य कळवा a.kelkar9@gmail.com 

 या लेखन मालेची सुरवात करताना आज आपण माहिती घेऊ पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपती - कसबा पेठ गणपतीची 

 कसबा गणपती हे अखिल पुण्यनगरीचे ग्रामदैवत. चारशेपेक्षा अधिक वर्षांपासुन अस्तित्वात असलेले ! कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दोन ग्रामदैवतं! मुळा, मुठेच्या संगमावर वसलेल्या पुण्यनगरीतील हे गणेश दैवत सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे, म्हणजे अगदी पुरातन असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. मंगलकार्य असो, लग्न , मुंज असो वा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, घरातील पहिली अक्षता जाते ती कसब्याच्या गणपतीला ! 
 हे जयति गजानाना, कार्य निर्विघ्नपणे सिद्धिस जाऊ दे ! अशी प्रार्थनाही केली जाते. मंदिरात गणेशजन्माचा उत्सव वर्षातून तीनदा साजरा करण्यात येतो. या गजाननाच्या पूजनाचे भाग्य अनेक पिढ्यांपासून ठकार घराण्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे. ठकार घराणे मूळचे विजापूरचे ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी विजापूर जिल्ह्यातल्या इंडी तालुक्यातील आठ ब्राह्मण घराणी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून, आपला मुलुख सोडुन निघाली. ठकार, ढेरे, उपाध्ये, धर्माधिकारी, कलंगे, निलंगे, वैद्य, , कानडे अशी ही आठ कुटुंबे ! ही देशस्थ ब्राह्म्ण मंडळी मार्गक्रमण करीत असताना त्यांना नगर जिल्ह्यात अडविण्यात आले. यातील ढेरे कुटुंबातील एका व्यक्तीला बाटविण्यात आले. त्यानंतर ही मंडळी मजल दर मजल करीत पुण्यात पोचली व नदीकाठी असलेल्या भागात स्थायिक झाली. हीच आजची कसबा पेठ ! यातील कलंगे आणि निलंगे सोडून बाकी सर्व सहा घरे आज शेजारी शेजारी आहेत. या प्रवासात ठकारांपैकी श्री. विनायकभट्ट ठकार य़ांच्याकडे त्यांच्या नित्यपूजेतील, गजाननाची मुर्ती होती. तांब्याच्या आकाराएवढी ही मूर्ती ! विनायकभट्टांनी आपल्याच घरात तिची प्रतिष्ठापना करुन तिचे नित्य पूजन सुरु केले. 

 आज अनेक वर्ष केलेल्या सततच्या शेंदुरलेपनामुळे मुळ मूर्ती झाकून गेली आहे. आता ती जवळपास तीन फुट लांब व साडेतीन फुट रुंद अशी दिसते.   कसब्यातील फणी आळीत मंदीराचे प्रवेशद्वार असून ते पूर्वाभिमुख आहे. श्री गजाननाची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूळ मूर्तीची स्थापना केलेला गाभारा दगडी आहे जो राजमाता जिजाऊसाहेबांनी बांधुन दिला आहे व आजही जसाच्या तसा आहे. असे म्हणतात की जेव्हा शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी, अत्यंत काळजीयुक्त मनाने विनायकभट्टांकडे भविष्य जाणण्यासाठी गेल्या. विनायकभट्ट उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी महाराज परत येण्याचा दिवस व वेळ अत्यंत अचूक सांगितली. तो पुढे अर्थातच बरोबर ठरला. यामुळे अत्यंत संतुष्ट होऊन, विनायकभट्टांना काही हवे असल्यास सांगा, असे विचारले. त्यावेळी, स्वत:साठी काहिही न मागता, माझ्या मोरयाला गाभारा बांधुन द्या, असे त्यांनी सांगितले. या गाभा-यात अत्यंत पावित्र्याने , सोवळे नेसुनच प्रवेश करता येतो, मुर्तीला स्पर्श करता येत नाही. या पहिल्या गाभा-याची मंडपी चांदीची आहे, शके १८३१ मध्ये बांधलेली आहे. या मुख्य गाभा-याबाहेर दुसरा गाभारा आहे जिथून भक्त श्री मोरयाचे दर्शन घेऊ शकतात. ह्या गाभा-याची मंडपी शके १८४८ मध्येर रावबहादूर केंजळे यांनी बांधली आहे. असे सांगण्यात येते की, श्री. केंजळे यांनी नव्या पुलाचे कंत्राट घेतले होते परंतु कामात यश येत नव्हते व पुल सारखा पडत होता. त्यावेळी त्यांनी श्री मोरयाला कार्यसिद्धीसाठी नवस बोलला व पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी ही चांदिची मंडपी बांधुन घेतली. मुख्य प्रवेशद्वारात चांदीची महिरप असुन दोन्ही बाजुला संगमरवरी हनुमंत आणि गरुड आहेत. तसेच जय-विजय यांची मोठी चित्रे आहेत जी, श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांनी काढलेली आहेत. बाहेर सभामंडप आहे व दोन्ही बाजूस सुरुचे पाच महिरपदार खांब आहेत. मंदिराच्या वास्तूचा पुढचा भाग तीन मजली असून सर्वात वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. पुर्वी येथुन रोज सनई-चौघडा वादन होत असे. आजही काही विशेष दिवशी (जसे की भाद्रपद, माघ, ज्येष्ठ उत्सव) येथे सनईवादन होते. 

 कसबा गणपतीची ही मूर्ती गजाननाच्या ओळखीच्या स्वरुपापेक्षा खूपच वेगळी आहे. सततच्या शेंदूरलेपनामुळे मूळ मुर्ती त्या लेपनात लुप्त झाली आहे. ह्या गजाननाच्या डोळ्यांच्या ठिकाणी हिरे आणि नाभिकमलात माणिक जडविण्यात आले आहे. देवाची नित्य उपयोगातील उपकरणी चांदीची आहेत, यात मखर , प्रभावळ, मुकुट, चंद्र, गंध, रिद्धी, सिद्धी यांचा समवेश आहे. दिवसातुन दोनदा गजाननाची पूजा होते. विशेष दिवशी जसे की, विनायकी, संकष्टी चतुर्थी, रंगपंचमी, वर्षातील तीन गणेशोत्सव (माघ, ज्येष्ठ, आणि भाद्रपद) गणपतीला “पोशाख” करण्यात येतो. भाविकांच्या श्रद्धेचे पारणे फेडणा-या पोषाखाचे स्वरुप म्हणजे, देवाला सोवळे, भरजरी शाल, मुकुट, व अनेक अलंकार असे असते. देवापूढे दोन पुरुषभर उंचिच्या समयांमध्ये अहोरात्र नंदादीप तेवत असतो. गाभा-यात मुख्य देवतेशिवाय, नंदी-महादेव, दत्त, देवी यांच्या मुर्ती आहेत. तसेच बाहेरच्या बाजूला हनुमानाचे छोटेखानी मंदीर आहे. कसबा गणपती मंदिराचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे रोज रात्री महासाधू मोरया गोसावी यांची पदे अत्यंत भक्तिभावाने, उत्साहाने आणि मुख्य म्हणजे नित्यनेमाने गायली जातात.

सर्व माहिती संग्रहीत

१३ ऑक्टोबर, २०१५

शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा

कोल्हापूर  अंबाबाई देवळातील  नवरात्र पूजा 

१३/१०/२०१५= मंगळवार= आदी लक्ष्मी
१४/१०/२०१५ = बुधवार = धन धन्य लक्ष्मी
१५/१०/२०१५ = गुरुवार =धैर्य लक्ष्मी
१६/१०/२०१५ =शुक्रवार =गज लक्ष्मी
१७/१०/२०१५=शनिवार =  संतान लक्ष्मी
१८/१०/२०१५ = रविवार = त्र्यंबोली भेट / अंबारीतील
१९/१०/२०१५= सोमवार= विजय लक्ष्मी
२०/१०/२०१५ = मंगळवार = विद्या लक्ष्मी
२१/१०/२०१५ = बुधवार =महिषासुर मर्दिनी
२२/१०/२०१५= गुरुवार = गुरु घोडा रथातील
२३/१०/२०१५= शुक्रवार = ऐश्वर्य लक्ष्मी


पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या