४ ऑक्टोबर, २०१०

रांगेचा फायदा सर्वांना


आजच एक बातमी ऐकली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीने असा निर्णय घेतला आहे की नवरात्रीत कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणा-या सर्व भाविकांना एकाच रांगेतून दर्शन मिळेल. सर्व मंत्री, अती महत्त्वाच्या व्यक्ती यांना ही हाच नियम लागू असेल.
असा हा योग्य निर्णय घेतल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन . देवाच्या दरबारात सर्वजण सारखेच असतात. तिथे लहान - मोठा, मंत्री - सामान्य माणूस असा भेदभाव नसतो हेच खरे.
हा निर्णयाची अंबलबजावणी अगदी काटेकोरपणे व्हावी हीच इच्छा. तसेच महाराष्ट्रातील इतर देवस्थानांनी ही जसे शिर्डी, शेगाव, पंढरपुर, सिध्दीविनायक, दगडूशेठ आणि हो अगदी लालबागचा राजा येथेही हाच नियम लवकरात लवकर लागू व्हावा.

देवाचिया द्वारी उभा क्षण भरी ! तेणे मुक्ती चारी साधियेला !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या