१ मे, २०२२

दोन कल्याणकारी मारुती स्तोत्रे

."मंत्र, स्तोत्रे आणि चमत्कार"

वि. के फडके  यांच्या पुस्तकातील
*दोन कल्याणकारी मारुतीस्तोत्रे* या लेखाचे क्रमश: वाचन 
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

भाग - १ 📝



महाराष्ट्राचे महान संत समर्थ श्रीरामदास स्वामी यांनी रचिलेले 'भीमरूपी स्तोत्र' महाराष्ट्रात जितके लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता गोस्वामी तुलसीदासाच्या 'हनुमान चालीसा' ने उत्तर भारतात संपादन केली आहे. ही दोन्ही स्तोत्रे विलक्षण प्रभावी असून त्यांच्या नित्य पठणाने अनेक व्याधी व संकटांचा नाश होतो असा त्यांचा लौकिक आहे.
      समर्थ रामदास आणि गोस्वामी तुलसीदास हे दोघेही परम रामभक्त होते; परंतु परकीयांच्या दबावामुळे सत्व विसरलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करुन त्या समाजाला बलशाली व तेजस्वी बनविण्यासाठी दोघांनीही महारुद्र हनुमंताचा आदर्श सर्वसामान्यांपुढे ठेवला आहे. श्री समर्थांनी जशी अकरा हनुमंतांची स्थापना केली तशीच गोस्वामी तुलसीदासांनी काशी क्षेत्रात बारा हनुमंतांची स्थापना केलेली आहे!
 
      या दोघा महान संत कवींनी रचलेली, 'भीमरुपी स्तोत्र' व 'हनुमान चालिसा स्तोत्र '  ही दोन स्तोत्रे हा देखील हनुमान उपासनेच्या प्रचाराचाच एक भाग होता !

क्रमश:🚩
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
देवा तुझ्या द्वारी आलो 

२८ एप्रिल, २०२२

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

.'मी तुझ्या पाठीशी'
'भिऊ नकोस ' अजिबात
याच शाश्वत विश्वासाने
दिवसाची होते सुरुवात 

चैत्र वद्य त्रयोदशी 
गुरुवार २८/४/२२
स्वामी समर्थ पुण्यतिथी 🙏🚩

"देवा तुझ्या द्वारी आलो " 📝
www.kelkaramol.blogspot.com

१९ एप्रिल, २०२२

१० एप्रिल, २०२२

श्रीराम नवमी

.२७ नक्षत्रात 'पुष्य' नक्षत्र सर्वोत्तम मानतात. चैत्र शु.नवमीला जन्म असणा-या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म पुष्य नक्षत्रावर


आज चैत्र शु नवमी ( १० एप्रिल २०२२)  आणि आज सूर्योदयापासून संपूर्ण दिवस 'पुष्य' नक्षत्रच आहे.



 हा एक आजच्या घडून आलेला छान योगायोग

'श्रीराम नवमीच्या' सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांप्रती शुभचिंतन 💐🙏

"देवा तुझ्या द्वारी आलो

२३ मार्च, २०२२

अशी ही थट्टा

अशी ही थट्टा 

आज एकनाथ षष्ठी  ( फाल्गुन कृ षष्ठी) . आजच्या तिथीला संत एकनाथ महाराजांनी  देह ठेवला. आजच्या दिवसाच्या निमित्याने त्यांची एक मला आवडलेली विशेष रचना  "अशी ही थट्टा" इथे देत आहे


यातील मेसेज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यावा. समजायला तशी सोपीच आहे.

बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भलभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा

थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा

थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा

थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा

थट्टेतून सुटले चौघेजण
शुक, भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा

एका जनार्दन सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा
//
थोडं अवांतर: संत एकनाथ महाराजांनी ज्या अनेक रचना केल्यात त्या प्रत्येक रचनेत शेवटच्या कडव्यात ते स्वतःसाठी 'एका जनार्दनी' असा उल्लेख करतात. वरच्या रचनेतही तसा उल्लेख आहे. आणखी काही
उदाहरणे-

माझ्या मना 
लागो छंद, गोविंद नित्य गोविंद!
यात शेवटी ते म्हणतात
गोविंद हा जनीं-वनीं
म्हणे एका जनार्दनीं !
//
काया ही पंढरी ,आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग!
देखिली पंढरी देही-जनी-वनीं
एका जनार्दनी वारी करी!!
//
संत एकनाथ महाराजांना विनम्र 🙏🌸

फाल्गुन कृ षष्ठी
(नाथषष्ठी)
२३/३/२२
Kelkaramol.blogspot.com 📝
देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🌸 

२२ मार्च, २०२२

तारीख का तिथी

तारीख का तिथी?

हिंदू आहात ना?  मग लाज का वाटते तिथीने उत्सव साजरे करायची?


शिवजयंती  खरं म्हणजे ३६५ दिवस साजरी व्हायला पाहिजे हे टिपिकल राजकीय भाष्य कृपया नको. आम्ही ३६५ दिवस देवघरातील गणपतीचे पूजन करतो, १२ संकष्ट्या तेवढ्याच विनायकी ही करतो. पण भाद्रपद शु.चतुर्थीचा गणेशोत्सव किंवा माघ शु चतुर्थीची गणेश जयंती अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करतो. त्यामुळे ३६५ दिवस महाराजांना स्मरून शिवजयंती तिथीने साजरी करायला का कमीपणा वाटतोय?

 तारखेने १९ फेब्रुवारीलाच गोंदवलेकर महाराजांचा जन्मदिवस पण आपण जन्मोत्सव तिथीने करतो ना?

काल शिवजयंतीला दोन राजकीय नेते तारीख -तिथीवरुन भांडत होते. एकानं मुद्दा उपस्थित केला की तुम्ही तुमचे वाढदिवस तिथीने करता का?

मी म्हणतो असा विचार करायला काय हरकत आहे? अहो तुम्ही मेल्यावर तुमची मुले तुमचे श्राध्द तिथीने करतात मग वाढदिवस ही तिथीने करायला काय हरकत आहे?

आजकाल तुम्हाला एवढ्या सोई-सुविधा आहेत ( गुगल/ अँप वगैरे)  की समजा एखाद्याला आपली तिथी माहित नसेल तर शोधायला फारसे कष्ट ही पडत नाहीत.

आमचे नवीन वर्ष गुढी-पाडव्यालाच हा विचार जर दिवसेंदिवस रूजू शकतो तर आमचे उत्सव/ वाढदिवस पण तिथीनेच करणार हा नव-विचार रूजवायला काय हरकत आहे?

हिंदू आहात ना?🚩

( विचार पटले असल्यास ५ जणांना सांगायला हरकत नाही) 

अमोल 📝
#रंगपंचमी_🌈 

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या