January 24, 2020

साडेसाती आणि महादशा

दर अडीच वर्षानी शनी चा ग्रह बदल झाला की साडेसाती वर वारेमाप चर्चा होते.

साडेसाती सुरु म्हणजे त्रास सुरु होणार / संपली म्हणजे आनंदी आनंद असं काहीच नसतं

ज्या राशीचा साडेसाती शी दुरान्वये संबंध नसतो अशा राशींच्या व्यक्ती ही जिवनात तितक्याच  त्रस्त असतात. काही जण म्हणतात आमची साडेसाती संपली तरी अजून त्रास आहे,  असे का?

तर मंडळी माझ्यामते आपल्या जिवनात साडेसाती पेक्षा ही सगळ्यात निर्णायक घटक ठरतो तो म्हणजे तुम्हाला कुठल्या ग्रहाची महादशा आहे ते.

गुरु ( १६ वर्षे) , शनि ( १९ वर्षे) , बुध ( १७ वर्षे) , शुक्र ( २० वर्षे)   यांच्या दशांचा कालावधी हा साडेसाती पेक्षाही खूप मोठा असतो. आणि हे ग्रह ( आणि त्यांचे नक्षत्र स्वामी) पत्रिकेतील ६,८,१२ चे कार्येश असतील तर भले साडेसाती नसली तरी आयुष्यात अनेक संकटे उभी राहू शकतात. साडेसाती ही एकत्र असेल तर दुष्काळात तेरावा.
साडेसाती संपली तरी परिस्थितीत फरक पडत नाही

चांगल्या ग्रहाची दशा ( पत्रिकेत चांगले स्थान देणा-या) आणि साडेसाती  माझ्यामते बॅलेन्स लाईफ देतात

 शिक्षणाच्या काळात आलेल्या राहू सारख्या ग्रहाची दशा शिक्षणाची वाट लावतातच. अशीच दशा विवाहाच्या काळात आंतरजातीय विवाह घडवून आणू शकते ( इतर ग्रह योग ही विचारात घ्यावे लागतात )

त्यामुळे आयुष्याच्या घडणा-या अनेक ब-या वाईट गोष्टीत साडेसाती बरोबरच महादशा/ अंतर्दशा यांचाही विचार होणे आवश्यक

📝 अभ्यासक

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या