February 22, 2009

७ ऑफ पेन्टॅकल कार्ड-संयमाची जोपासना

ह.अ भावे यांच्या व्यक्तिमत्त्व आणि विकास या लेखमालेतून साभार-
संयमाची जोपासना -



काळ जरी कठीण असला तरी ईश्वरनिर्मीत या जगात प्रतीक प्रश्नाला उत्तर असतेच.
या कठिण काळावरही इलाज आहे. आणि तो इलाज खात्रीचा आहे. मानवाच्या इतिहासात असे कठीण काळ अनेक वेळा आले.
यावर उपाययोयना फार पुर्वीच सुचवली गेली आहे.ही उपाययोयना अनेक पुस्तकांत सापशेल. ती उपाययोजना बायबल मधे आहे,
ग्रंथसाहेबात आहे, वेद -उपनिषदात आहे, भगवद्दगितेत आहे. हे उपाय कालातीत व सार्वत्रिक आहेत. हे उपाय शेकडो वर्षे साठवले गेलेल्या
शहाणपणातून लिहिले गेले आहेत. परिस्थिती प्रत्तेक काळात वेगवेगळी असली तरीही हे उपाय चिरस्थायी आहेत.श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म्योगाचा
उपदेश केला, त्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला झाला, त्याप्रमाणे आजपर्यंतच्या पिढीलाही झाला. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग सापडला.
शेकडो पिढ्या बदलल्या तरीही भगवदगीतेचे दीपगृह लोकांना प्रकाश दाखवतच आहे.
अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्या वेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला दुस-य़ा अध्यायात विचारले,’बुध्दी स्थिर झालेला स्थितप्रण्य कसा असतो? कसा राहतो?
कसा बोलतो? यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दुस-या अध्यायात पंचान्नव्या श्लोकापासून बहात्तराव्या श्लोकापर्यंत उत्तर दिले आहे.
या सर्व उत्तरात संयम कसा पाळावा, आपल्या आत्म्यावर विजय कसा मिळवावा, हेच सांगितले आहे. माणसामध्ये जो आत्मा असतो, ते परमात्म्याचेच प्रतिबिंब असते
माणसाचे शरीर नष्ट पावते पण कपडे बदलावे त्याप्रमाणे आत्मा दुसरे शरीर धारण करतो.
स्थितप्रद्न्य आणि संयमी माणूसच आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य प्रस्थापित करु शकतो. म्हंणूनच मानवी जीवनामध्ये स्थितप्रद्न्येला आणि संयमाला फार महत्व आहे.
संयम धोरण म्हणून स्विकारा




संयम या एका शब्दात शांतता, सहनशीलता, आध्यात्मिकता , श्रध्दा इत्यादी अनेक शब्द भरलेले आहेत. संयम हा शब्द रत्नासारखा आहे. संयम पाळल्याने तुम्हाला
अनेक गुण बाळगता येतील. तुमचं स्वत:चं जगण्याचं तत्वद्न्यान त्यातून तयार होईल. सध्याचा काळ गोंगाटाचा व गोंधळाचा आहे. त्यातून ज्याला प्रगती करुन घ्यायची
आहे त्याला संयमाशिवाय तरणोपाय नाही.
संयम हा शब्द तुमच्या जीवनात मुरला पाहिजे, संयम हे तुम्ही धोरण म्हणून स्वीकारले पाहिजे. तरच सध्याच्या कठीण काळात तुम्हाला सुखाने जगता येईल.
तुम्ही आजचा दिवस उत्तम घालवा म्हणजे तुमचे आयुष्य सुखात जाईल. ’आजचा दिवस चांगल्या प्रकारे घालवा’ हा संदेश गौतम बुध्दाने दिला होता
बुध्दाने सांगितले होते, की ’या जगात आज दिसणारे निसर्गसौंदर्य, मैत्री भावन्न, उदात्त विचार, स्फूर्ती या जीवनातील अमोल गोष्टी आहेत.’उद्याची काळजी न करता
आजचा दिवस सुंदर जगा हीच शिकवण सर्व धर्मांनी दिली आहे. उद्याची चिंता परमेश्वरावर सोडा
.

February 14, 2009

टॅरोट कार्ड नं ६ - लव कार्ड

दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित ऊन पडतं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येतं - सुधीर मोघे



१४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन दिवस . - प्रेमाचा उत्सव

आपल्याकडे ही अजाकाल हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. बर्‍याच कॉलेजात रोझ डे, चॉकलेट डे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम केले जातात. याच वेळी काही विद्यार्थी संघटना विरोध करतात. प्रेमाच्या संदेशाने बाजार सजतो, नटतो, गुलाबी रंगाने वातावरण भरुन जाते।



असो
टॅरो कार्डात एक मेजर कार्ड ( नंबर ६ ) लव कार्ड म्हणून आहे.
हे कार्ड अर्थात रिलेशनशीप बद्दल आहे.
प्रेम प्रकरण, लग्न , नवीन मैत्री यासंबंधी प्रश्नाबाबत हे कार्ड रिडिंग मधे हमखास सापडतेच.


जाता जाता या जागतीक प्रेम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

February 9, 2009

कार्तिकीचे अभिनंदन !!!

माहेराहुनि गलबत आले
मला सखीचे स्वप्न जडे;
हृदयामधल्या गुपितामध्ये
निशिगंधाचे फूल पडे!
अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे
शब्द परतले घरोघरी;
जडबंधाच्या मिठीत रुसली
चैतन्याची खुळी परी...
या वाटेवर रघुपति आहे
त्या वाटेवर शिळा;
सांग साजणी कुठे ठेवु मी
तुझा उमलता गळा?

सारेगम लेटीलचॅम्प स्पर्धेत अंतीम फेरीत विजयी ठरलेल्या कार्तिकी गायकवाड हिचे अभिनंदन.
भविष्यातील तिच्या संगीत कारकिर्दीस अनेक शुभेच्छा !!!!
ही तिच्या आयुष्यातील एक नवी सुरवात आहे ( एस ऑफ वॉन्ड ) . या स्पर्धेने तिला एक चांगली सुरवात मिळवून दिली आहे.
अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे। माउलीचे आशीर्वाद तिच्या पाठी सतत राहोत.




February 3, 2009

१० ऑफ कप टॅरो कार्ड -

या टॅरो कार्डाचा अर्थ आहे कौटूंबीक आनंदाचे वातावरण, उत्साह असा आहे.
यासंबंधी वपुर्झातील हा उतारा वाचण्यासारखा आहे.

जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.
आयुष्य एक सतारीसारखं वाद्य आहे.
ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करुन घेणं, हाच धर्म.
तो धर्म समजला तर छोट्या बीजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.
त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात.पैशाशिवाय. पक्ष्यांचं धन वेगळंच असतं.
गाणं हेच त्यांचं आयुष्यभरचं कार्य.
पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात.
स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा,
एक तरी पक्ष्याची हाऊसिंग सोसायटी आहे का ?
तसं असतं तर झाडाझाडांवर राजीव, संजय, इंदिरा नावाच्या
अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या.
बघा, असं होतं. 'पक्ष्यांचा' हा शब्द वापरल्याबरोबर मी भरकटले.'पाखरु' म्हणायला हवं होतं
पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी,
पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की
घर आपण होऊन काटक्या टाकतं.
म्हणून झाडंही नोटिसा पाठवत नाहीत.
मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षा करुन
आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं
सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं, की सतार
योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.
- व.पु. काळे

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या