April 27, 2013

श्रीधरस्वामी पुण्यतिथी


नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे,
स्वानंदामृत त्र्प्ताय श्रीधराय नमो नमः||









आज श्रीधरस्वामी पुण्यतिथी

मराठवाडयातील चिंचोली या गावी स्वामींचा जन्म दत्तजयंतीच्या परमपावन दिवशी झाला. अध्यात्माबरोबरच समाजाचे , देशाचे उन्नयन कसे होईल , आपला देश , आपले देशबांधव , आपली संस्कृती , आपले तत्त्वज्ञान या साऱ्यांची योग्यता जगाला कशी पटवून देता येईल , याचा विचार स्वामी सतत करीत असत.


श्रीधरस्वामींनी पांडुरंगमाहात्म्य मल्लरीमाहात्म्य व्यंकटेशमाहात्म्य हे तीन महत्त्वाचे माहात्म्यग्रंथ आहेत. वेदान्तसूर्य आणि जैमिनी अश्वमेध या ग्रंथांचंही श्रीधर स्वामींच्या साहित्यसृष्टीत उल्लेखनीय स्थान आहे.
स्वामीजींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती. या ओढीनेच स्वामीजींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले.सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरुंच्या चरणी झिजवला.... त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा प. पू. भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.....
साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते..... त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे.... व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे (कर्नाटकात) जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली..... त्याप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच..... त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला.....श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला.
श्रीधर स्वामींची समाधी.

आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे..... साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.....
मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासिन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. प.प.भगवान.श्री.श्रीधर स्वामी महाराज. यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला.त्यांचे असंख्य भक्त महाराष्ट्रात त्याच प्रमाणे कर्नाटकात काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरघळ , चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवुन आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी "श्री.समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड" या संस्थेची स्थापन १९५० साली गडावर केली. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तुंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थभक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्याप्रमाणात भौतिक सुविधा घडवुन आणल्या.त्यांची समाधी कर्नाटकातील वरदपूर येथे आहे.



( माहिती : संग्रहीत)

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या