April 24, 2021

क्विन आँफ पेनटँकल

. Queen of pentacle

११ एप्रिलचा रविवार, सुट्टी असल्याने तस निवांतच होतं. मात्र आज लँपटाँप घेऊन ती १२५- १५० जणांची लिस्ट ५० वर आणायलाच पाहिजे हा विचार पक्का केला. बातम्या बघायचा कंटाळा आला होता. शनिवार-रविवार विकेंड लाॅकडाऊन डिक्लेअर झालाच होता. एका गोष्टीचे समाधान वाटत होते की आपले कार्य शुक्रवारी असल्याने यात आपण अडकलेलो नाही. सगळीकडे चर्चा मात्र सुरु होती. ८ दिवसाचा लाॅकडाऊन, १५ दिवसाचा लाँकडाऊन लागू शकतो, कडक निर्बंध लागू शकतात. पण केंव्हा पासून, केंव्हा पर्यत ,पाडवा झाल्यावर का आंबेडकर जयंती झाल्यावर?  १५ पासून ८ दिवस धरले तर २२ तारखेपर्यत. म्हणजे २३ तारीख ( शुक्रवार ) परत मिळेल पण मग लगेच शनिवार-रविवार वीकेंडसाठी लाँकडाऊन मग १ दिवस सूट कशी मिळेल?  लाॅजिकलच नाही. १५ दिवसाचा लाँकडाऊन/ कडक निर्बंध  होणार अशी मनाची तयारी होत चाललेली.
           अशाच टेंशन मधे दिवस गेला. जी काही ठरवलेली कामे उरकायची ती उरकली. रात्री क्रिकेटचा सामना सुरु होता पण तिकडे ही फारसे लक्ष नव्हते
त्याचवेळेला डाँ कविता जोशी , सानपाडा यांचा फोन आला. एका जोतिष विषयक गृपवर आम्ही एकत्र आहोतच पण आमची ओळख खूप आधीपासूनची जेंव्हा पारंपारिक जोतिषाच्या आधीही मी जेंव्हा 'टँरो कार्ड रिडिंग " घ्यायचो तेव्हापासून. यानिमित्ताने त्या माझ्या घरीही येऊन गेल्या होत्या मात्र बरीच वर्ष प्रत्यक्ष संपर्क किंवा बोलणे झाले नव्हते.

त्यांनी फोन केला होता तो जोतिष समूहात जी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सुरु होती त्याच अनुषंगाने. जवळ जवळ २० एक मिनिटे आम्ही बोललो. सध्याचे ग्रहयोग, एकंदर ठाम उत्तर न मिळणे यावरून आमची चर्चा थोडी टॅरो कार्ड रिडींग कडे सरकली. त्यांनी त्यांचे सध्याची वेगवेगळ्या परिस्थितीची घेतलेली रिडिंग, मुलांची मानसिक अवस्था, आँन लाईन शाळा,  पुढचे व्यवसाय, एकंदर सगळाच बदल आणि परिस्थिती यासंबंधी भरपूर चर्चा केली. तसेच टॅरो कार्डचा सकारात्मक ( +ve) affirmation म्हणून कसा वापर करता येईल यावर ही बोललो.

 मी काही रिडींग घेतले का परत असे त्यांनी विचारले. कारण मागच्या एप्रिल / मे मधे कोविड महामारीवरचे घेतलेले कार्ड रिडिंग त्यांनी पाहिले होते. त्यांना नम्रपणे सांगितले की सध्या टॅरो कार्ड रिडिंग घेणे होत नाही मात्र आज तुमच्याशी बोलणे झाल्यावर मला प्रेरणा मिळाली. निदान आठवड्यातून एकदा तरी रिडिंग घेत जाईन असे सांगून चर्चा संपवली.

नंतर विचार केला सध्याच्या परिस्थिती वर रिडिंग घेण्यापेक्षा सध्या आपल्या समोर जो प्रश्ण उभा आहे  की 
' ठरलेले कार्य सुरळीत होईल का?  ' यावर उद्या सकाळी रिडिंग घेऊ. सकाळी पूजा करुन झाल्यावर मनात वरचा प्रश्ण धरुन एक कार्ड काढले,  ते कार्ड होते "Queen of Pentacle"

कार्ड जरी चांगले निघाले तरी माझ्या प्रश्णाचे सरळ उत्तर मला मिळाले नाही. पण कार्ड +ve निघाले त्यामुळे जरा बरे वाटले. संदर्भ पुस्तकात लिहिले होते
Emotional centre , security
Affirmation : I have what I need to feel secure.

गुढीपाडवा झाल्यानंतर ३०  तारखेपर्यंत कडक निर्बंध, लग्नासाठी २५ जण वगैरे नियम आले. आमच्या कार्यासाठी सांगलीहून पौराहित्य करण्यासाठी येणारे पटवर्धन गुरूजींचा फोन आला आणि त्यांनी सध्याच्या परिस्थितीत येणे शक्य होणार नाही असे सांगितले.  अर्थात त्यांचे बरोबरच होते. त्यांना हरकत नाही म्हणून सांगितले.

पण मग आता?  पुढे काय

आणि मग एकदम लक्षात आलं आपल्या बेलापूर मधील गोखले काकू ( Queen of Pentacle) . तसं त्याना आधी जुजबी बोलून ठेवलेच होते की काकू काहीही झालं तरी प्रणवची मुंज करायचीच,  समजा आमचे गुरुजी नाही येऊ शकले तर तुम्ही व्रतबंध सोहळा पार पाडायचा

काकूंना फोन करुन सांगितले,  त्या लगेच तयार झाल्या. सध्याच्या परिस्थितीत मुंज बाहेर हाॅल मधे न करता घरीच करु असे ही ठरले आणि २३ ला ठरल्या प्रमाणे गोखले काकू आणि कुलकर्णी काकू यांनी पौराहित्य करुन व्रतबंध संस्कार संपन्न झाला

साधारण १५ दिवसा आधी  ग्रामदैवत गणपतीला ( बेलापूरचा राजा)  पत्रिका निमंत्रण पत्रिका ठेवायला जाताना मंदिराच्या आधी एका पक्षाची घाण अंगावर पडली.  त्यावेळी घरच्या Queen ने सांगितले की शुभ शकुन झाला आहे. गुढीपाडव्याला  कुलदैवत रामेश्वराला ( आचरा, कणकवली)  पत्रिका ठेऊन कार्य व्यवस्थित होण्यासाठी नारळ ठेवला आहे हे स्नेही बापटांनी ही सांगितले होतेच




तरी देखील Queen of pentacle चा एका ठिकाणी असलेला उल्लेख
This lady really has her life in order. Nothing rocks or shakes her. She is the stable centre of her family and group of friends

हा प्रत्यय आमच्या घरच्या 'क्विन'  ने सार्थ करुन दाखवला.

आजूबाजूला जी भयानक परिस्थिती आहे त्यात ही ठरलेले कार्य निविघ्न पार पडण्यात परमेश्वरा बरोबरच या  नारी शक्तीचा ही मोठा वाटा होता

आणि हेच ते कार्ड सांगत होते, पण लक्षात उशीरा आले 🙏

अमोल केळकर 📝
२४/०४/२१

April 21, 2021

चला राम घडवू या

.
" चला राम  घडवूया " 🚩🚩

मंडळी एक वेगळा विषय मांडतोय. उद्या रामनवमी आहे. यानिमित्यानेच मध्यंतरी एका संस्थेने निबंध स्पर्धेच आयोजन केले होते, त्यात खुल्या गटातील अनेक  विषयांपैकी हा एक विषय होता. यानिमित्याने माझे काही विचार इथे मांडतोय. 


//

निबंध स्पर्धेसाठी  त्यातही खुल्या गटा साठी हा  एक विषय . सहज इतर गटांसाठीचे ही  विषय बघितले त्यात  लहानगटा साठी  विषय होता 
 " चला राम बनूया "

संकेत स्पष्ट आहेत , काय करायचे  आहे दिशा स्पष्ट आहे . त्यांना  ' राम बनण्यासाठी' आपणास  सक्रिय सहभाग घ्यायचा आहे , त्यांना सहकार्य , मार्गदर्शन करायचे  आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः ला आधी राम तर बनायचे आहेच पण  परिस्थतीनुसार /  भूमिकेनुसार  कधी  राजा दशरथ ( वडील ) , कौसल्या  ( आई ) , विश्वामित्र  ( गुरु ) ,  प्रेमळ बंधू  ( लक्ष्मण ) , निष्ठावान पत्नी  ( सीता माई ) , अन्याया विरुध्द्व साथ देणारा सहकारी ( हनुमान )  तर वेळ प्रसंगी नितीमत्ता जागृत असणारा  शत्रू (  बिबिषण )  या वेगवेगळ्या भूमिका  समोरच्या व्यक्तीशी आपल्या नात्यानुसार निभावायच्या आहेतच. 

प्रभू  श्री रामचंद्राचे  विशेष गुण , त्यांचे  चरित्र  याची जाण ठेऊन सध्याच्या जीवन पध्द्तीत  ते कशा प्रकारे आचरणात आणता येतील  / इतरानाही प्रवृत्त करता येईल हे पहाणे महत्वाचे. 
 एकनिष्ठ राम,  एकबाणी राम, एकवचनी राम होणे म्हणजेच   आजच्या काळातले  शब्द जसे कमिटमेंट, इन्व्हॉलमेंट , फोकस  होणे आहे . माझे  आयुष्याचे ध्येय काय आहे ?  त्यादृष्टीने माझी वाटचाल आहे का ?  मी कुठे विचलीत तर होत नाही आहे  ना ?  माझे जे ध्येय आहे  त्याचा मला फायदा होईलच  पण त्याचा समाजाला पण फायदा आहे का  ?  माझे लक्ष मूळ ध्येयापासून विचलीत होत आहे का ?  असे लक्षात आल्यास  योग्य उपाययोजना काय  करायची  हे मी समजून घेऊन तसे  मी  माझ्या सानिध्यात येणा-यांसाठी ही अमलात आणीन आणि ' राम घडवण्याचा ; मनापासून प्रयत्न करेन 


राष्ट्रकार्याच्या यज्ञात  जर कुणी असुरी शक्ती विघ्न आणत असतील तर  त्याला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य  माझ्या रामात यावे, तशी त्याला बुध्दीयावी  यासाठी चे बाळकडू  मला  त्याला द्यावे लागेल. 

   पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वत: ला जे अपेक्षित राम राज्य आहे त्यातील  एक नागरिक  म्हणून आपण कुठे कमी पडतोय हे बघायचं आहे . स्वतःत सुधारणा घडवून आणायची आहे आणि दुस-याला ही त्या साठी मदत करायची आहे .  व्यवस्थेने घालून दिलेले नियम , सद्विवेकबुधदी चा वापर  मला करायचा आहे 
  
रामराज्य  येणे म्हणजे काय ?  

जिथे सर्व प्रजानन सुखी समाधींनी आहेत, एकोप्याने रहात आहेत.  कुणी कुणावर जबरदस्ती  करत नाही आहे . तशी जबरदस्ती झाली गुन्हा झाला तर लवकरात लवकर  न्याय  मिळत आहे , गुन्हेगाराला शासन  होत आहे . प्रजाजन आणि राज्यकर्ते यांच्यात सुसंवाद होत आहे 

वरील जर चित्र रेखाटले तर मी स्वतः यासाठी काय करतोय ? मी स्वतः जे कायदे आहेत , नियम आहेत  ते काटेकोर पणे बजावतो का ? का पळवाट काढतोय ? माझी कर्तव्य करतोय का ?  का फक्त हक्क सांगतोय? 


  हा सगळा विचार करुन आपण चांगला नागरिक बनू या आणि इतरांनाही  चांगला  नागरिक बनण्यास सहकार्य करु या  . घरोघरी असे प्रजानन  म्हणजेच राम आणि त्यांना तयार करणारे  पालक, गुरु, सहकारी , बंधू   निर्माण  झाले तर  रामराज्य ख-या अर्थाने  निर्माण होणार नाही का ?????  

तेंव्हा चला 


एकबाणी  होऊ या , एक वचनी होऊ  या 🚩
राष्ट्रप्रेम जागवू या , बंधुभाव वाढवू या 🚩
आधी राम होऊ या, असंख्य राम घडवूया 🚩

अंती राम राज्य आणू या 🚩🚩

जय श्रीराम 🙏

 अमोल केळकर

 

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या