भारतातील असंख्य ज्योतिषी ज्यांनी भारत जिंकेल असं म्हणले ते चुकले
आम्ही पण काय कमी नाही 
आम्ही तर 'दक्षिण आफ्रिका ' जिंकेल असं भकीत केले  होते.
( याचा अर्थ  भारत जिंकणार नाही हे आम्ही अधीच बोललो होतो.☺️
 त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की चुकणा-या *प्रसिध्द ज्योतिषीं* मधे आम्ही अजूनही ब-याच खालच्या पातळीवर आहोत 😊  ) 
भविष्य चुकले हे मान्य करायला काहीच हरकत नाही.
नियतीच्या सर्व योजना समजतीलच असे नाही , नियती पुढे कुणीच श्रेष्ठ नाही.
 हे ज्योतिषांसह सगळ्यांनी लवकर समजून घेणे आवश्यक.
ज्योतिषी चुकू शकतो ( कितीही मोठा ज्योतिषी असला तरी)  ,  आणि यात वावगे काहीच नाही.
काल किंवा त्या आधी ज्यांनी कांगारु जिंकतील असे भकित केले होते ( दिसलं तर नाही कुठे. श्री प्रसाद कुलकर्णी पंढरपूर यांचा अपवाद वगळता)  त्यांचे अभिनंदन पण यापूर्वी त्यांची भकिते चुकली नाहीत किंवा पुढे चुकणार नाहीत असेही नाही.
On serious note:
शास्त्राचा वापर नक्की कुठल्या गोष्टींसाठी करावा, किती करावा, कुणासाठी करावा, कसा करावा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे किती प्रसिद्धी द्यावी  याबाबत तमाम अभ्यासकांनी विचार करायची वेळ आली आहे.
*हे एक असे क्षेत्र आहे की इथे यश आणि प्रसिद्धी हातात हात घालून रहाणे जरा अवघडंच*. 
(कुणी आपल्या पेक्षा वरचढं होतंय असं वाटलं की नियती बरोबर कामाला लागते)
या गोष्टींचा विचार तमाम शास्त्र पंडितांनी / अभ्यासकांनी अवश्य करावा.
पुढील अचूक प्रेडिक्शन्स साठी सर्वांना शुभेच्छा 🙏💐
 
No comments:
Post a Comment