अहो काय सांगावे. अगदी या चित्रातील ( १० ऑफ वॉन्ड ) माणसासारखी आमची अवस्था झाली आहे.
ऑफिस मधे दररोज नवी कामे नुसती येऊन आदळत आहेत त्यामानाने कामाची उरक कमी आहे. ऑफीस मधून निघायला रोज उशीर होत आहे. ब्लॉगवर लिखाण तर दूरच साधे अंतरजालावर नुसता फेरफटका मारणे ही अवघड गोष्ट झाली आहे.

जागतीक मंदीच्या बातमीने मन स्थिर राहणे अवघड झाले आहे. स्टील एक्स्पोर्ट कंपनीत काम करत असल्याने नाही म्हणले तरी त्याचा अप्रत्यक्ष फटका बसण्याची चिन्हे आहेत. फॉरेन कस्टमर हात धुऊन मागे लागलेले आहेत. डिस्काउंट मागत आहेत. थोड्क्यात काय दुष्काळात तेरावा महिना अशी काहिसी आमची अवस्था झाली आहे.
बघुया पुढील वर्षापासून काही परिस्थितीत सुधारणा होते आहे का आणि नियमित लिखाण करायला जमते का ते ?
काही अवांतर -
या कामाच्या प्रेशर मधेही सुदैवाने सहेबाने ३ दिवसाची सुट्टी दिल्याने आज सांगलीला जात आहोत. सांगली ही माझी जन्मभुमी .
पटवर्धन संस्थानचे पसिध्द गणपती मंदिर हे सांगलीकरांचे आराध्य दैवतच. सांगलीला गेलो की न चुकता तेथे भेट देतोच. यावेळी नरसोबावाडीचे दत्त मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशिर्वाद घेण्याची इच्छा आहे. परत एकदा फ्रेश होऊन जेंव्हा पुढील आठवड्यात मुंबईत येईन तेंव्हा नवीन आव्हाने स्विकारण्याचे बळ नक्किच येईल.
जाता जाता - पनवेलहून प्रसिध्द होणार्या ' किल्ले रायगड' या दिवाळी अंकात टॅरो कार्ड विषयी लेख प्रसिध्द झाल्याची माहिती आईने दिली.
किल्ले रायगडचे मालक, संपादक, प्रकाशकांचे या निमित्याने मी आभार मानतो.
दिवाळी अंकातील हे माझे प्रकाशित झालेले पहिले लेखन मी माझ्या आई वडिलांना समर्पीत करतो।
No comments:
Post a Comment