August 11, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ४

. गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ४
---------------------------
"त्यांच्या पोटी जन्मा येतिल योध्दे चार महान "
- हे यज्ञपुरुषाचें वचन खरें ठरलें. त्या पायसच्या सेवनाने दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या.यथाकांली त्या प्रसूत झाल्या.कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकयीला भरत असे चार पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रसादांतील सुखाला सीमा राहिल्या नाहींत. नगरजनांचा आनंद तर, नुसता भरुन ओसंडत होता. श्रीरामादिक भावंडे रांगूं लागली,तरीहि अयोध्येतील स्त्रिया श्रीरामजन्माचे आनंदगीतच गात होत्या....
पुन: पुन: गात होत्या...
🎼
दोन प्रहरिं,कां ग शिंरी सूर्य थांबला?
राम जन्मला-ग सखी- राम जन्मला

या आनंदगीतांतच अयोध्या मग्न होती. प्रासादांत,श्रीराम दिसामासांनी वाढत होते.ते आतां चालूं लागले होते. बोबडे बोबडे बोलूं लागले होते. महाराणी कौसल्या, भगिनीसमान असलेल्या सवतींना कौतुकाने सांगत होती-
🎼
सावळा ग रामचंद्र...

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या