August 18, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ५

गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ५
---------------------------
"सावळा ग रामचंद्र"
- महाराणी कौसल्येचा 'सावळा रामचंद्र ' दिसामासांनी वाढला.बालवयातच त्याने धनुर्विद्या आत्मसात केली.धार्मिक ग्रंथ अभ्यासले.आता तो राज्यसभेंत येऊन बसूं लागला. त्याच्या समवेत लक्ष्मणादि त्याची लहान भावंडेंही निष्णात झालीं.एके प्रसंगी,राजा दशरथ पुत्रांसहवर्तमान राजसभेंत बसला असतां,महर्षी विश्वामित्र तेथे आले. राजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले,आणि नम्रपणे विचारले, " मुनिवर्य, काय कार्य असेल तें सांगा, मी तें सर्वस्वी शेवटास नेईन."
राजाच्या ह्या भाषणाने अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले-

🎼 जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या