साडेसातीचा त्रास कमी होण्याच्या अनेक उपायात नित्य किंवा दर शनिवारी 'शनी महात्म्य' पोथीचे वाचन हा एक प्रमुख उपाय म्हणून सांगितला जातो /केला जातो.
साडेसाती लागल्या लागल्या हा उपाय सुरु करणारे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतील पण बरेसचे जातक हे,त्रास सुरु झाला की जागे होतात.
अर्थात हे नैसर्गिक आहे कारण आपण सगळे सामान्य आहोत
अशांसाठी मी एक वेगळा विचार मांडतोय. शनी महातम्यात राजा विक्रमादित्य याला साडेसातीत काय त्रास झाला यांचे वर्णन आणि त्याला अनुसूरून इतर उपकथा आहेत. आपण जेव्हा वाचन करू तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा त्या कथेच्या मुळ भागाशी कशाप्रकारे co-relate होतोय हे पाहायचे. मग तुमचा त्रास आर्थिक, मानसिक, शारीरिक, प्रपंचिक, व्यवसायिक कसाही असो. ( राजा विक्रमदित्य सारखे तुमचे हात -पाय तोडले गेले पाहिजेत असे नाही )
कुठे तरी लिंक लागतेच
आणि मग यातून निस्तरून जाण्याची विनंती शनी महाराजांना करायची.
याने त्रास लवकर कमी होईल / संपेल वगैरे सांगणे हा या लेखाचा हेतू नाही तर राजा विक्रमादित्य ज्याप्रकारे शरण गेला होता / चुक कळली होती / सरेंडर झाला होता किमान त्याच्या किती प्रमाणात आपण समर्पित व्हायला पाहिजे हे आपापले ठरवायचे
शनी महाराजांची कृपा आपल्या सर्वावर राहो या सदिच्छा
देवा तुझ्या द्वारी आलो📝
14/2/2026
शनिवार
शनी प्रदोष

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा