September 1, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥४॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥४॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥




अर्थ : - चौथा श्लोक मनाच्या विविध स्वरूपांकडे वळला आहे. पहिल्या ओळीत मनाचा उल्लेख आहे. दुसऱ्या ओळीत बुध्दीचा उल्लेख आहे. तिसऱ्या ओळीत नीतीचा म्हणजे मन:शुध्दीचा उल्लेख आहे. चौथ्या ओळीत आत्म्याचा उल्लेख ‘अंतरी’ या शब्दाने आहे. आणि परमात्म्याचा उल्लेख ‘शाश्वत

सत्य’ या अर्थाने आहे. एका शेतकऱ्याच्या घरी एक साधू उतरला. शेतकऱ्याला बुध्दी, मन, आत्मा, परमात्मा या शब्दाबद्दल उत्सुकताही होती आणि घोटाळाही होता.
साधूने शांतपणे समजावून सांगितले, “तुझा मुलगा तापाने आजारी आहे. त्याने सकाळी आंब्यासाठी हट्ट धरला होता, तो हट्ट म्हणजे वासना बुध्दी. तो आंबा मिळत नाही म्हणून त्याने भोकाड पसरले, ते त्या मुलाच्या ‘मनाने’ पसरले. तू त्याला ‘तापात आंबा खाऊ नये’ हे सांगत होतास. तुझ्या पोटात तुटत होते, हा सगळा नीतीधर्माचा ‘मना’कडून ‘आत्म्या’कडे जाण्याचा प्रयत्न होता. तेवढ्यात तुझ्या मुलाचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या आजोबांच्या फोटोकडे गेले. त्या मुलाला आपल्या मृत आजोबांचे प्रेम आठवले. फोटोतील डोळ्यंाची भीती आठवली. फोटो स्वत: काही बोलला नाही. पण मुलगा शांत झाला. असा अबोल पण परिणामकारक आत्मा असतो. तुझा मुलगा नेहमी शहाण्यासारखा वागला, तुही तुझे आजच्यासारखे कर्तव्य केलेस, म्हणजे तुझ्या बेचाळीस पिढ्यांचे कल्याण होईल. हा परमात्म्याच्या पातळीवरचा विचार झाला. “
शेतकऱ्याला सोप्या शब्दात पुष्कळच समजल्यासारखे वाटले. मनाच्या चौथ्या श्लोकात रामदासांनी मनालाच बुध्दी, मन, आत्मा, परमात्मा या चार पातळ्यांवर उपदेश केला आहे.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या