September 5, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥६॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥६॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥






अर्थ : - राग हा चांगल्या हेतून धरला, तर त्यात वाईट काय आहे असा प्रश्र्न नेहमी पडतो. मुलगा खोटे बोलू लागला तर रागावू नये का? त्याने अभ्यास वेळेवर केला नाही तर रागावू नये का? मित्राला उसने दिलेले पैसे त्याने वेळेवर परत केले नाहीत, तर त्याला गोडीने सांगून काय उपयो

ग आहे? ते रागाचे कैवारी बिनतोड प्रश्र्न विचारण्याच्या अभिमानात उभे ठाकतात. मुलगा खोटे बोलते, ते बरोबर नाही. पण या मुलाला खोटे बोलायला कोणी शिकवले? प्रथम मुलगा खोटे बोलला तेव्हा आई-वडील किंवा मोठी माणसे कोणीतरी त्याचे कौतुक करतात आणि त्यातून त्या मुलाला खोट्याची चटक लागते. खोटे बोलण्याचे फायदे चटकन दिसतात. म्हणून त्याचा मोह आवरत नाही, मोठ्या माणसांना तो आवरत नाही, तर लहान मुलांना कसा आवरणार? आणि आपल्याच गुणाचे अपरिहार्य प्रतिबिंम मुलात दिसल्यावर मागून रागावून उपयोग काय? निदान जोपर्यंत आपण सत्यसंकल्प धरत नाही, तोपर्यंत राग किंवा रागाचे सोंग हासुध्दा दुटप्पीपणा आहे. आणि म्हणून तो बरोबर नाही. त्याच्या अलीकडला कामविकार तर सर्व विकाराचे मूळ. अर्थात् येथे त्याचा अर्थ वासनात्मक काम असा विस्तृत घ्यायवयास हवा. विकारांची दोन अंगे रामदासांनी तिसऱ्या व चौथ्या ओळीत सांगितली आहेत. ती म्हणजे मद आणि मत्सर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या कर्तबगारीबद्दल जी असूया वाटते, तिचे नाव मत्सर. आणि आपल्यापेक्षा धाकट्या माणसाच्या चुकीबद्दल जी तुच्छता वाटते तिचे नाव मद. हे दोन्ही विकार चुकीचे आहेत आणि अनावश्यक आहेत. आपली कर्तबगारी ही कणाकणानेच वाढत असते. तेव्हा खालच्याबद्दल तुच्छता दाखवू नये आणि त्याच कारणाने वरच्यबद्दल मत्सर बाळगू नये, हा मनाला केलेल गोड उपदेश आहे. काम क्रोध विकाराचे दुष्परिणाम गीतेच्या बासष्ट, त्रेसष्ठाव्या श्लोकात दाखवले. त्या विकारापासून मुक्ती ही परमशांती म्हणून सांगितली. आणि ती शांती न मिळवलेल्या माणसाबद्दल सहासष्ठावा श्लोक सांगतो, की विकारशून्य स्थिरबुध्दी नसेल, त्याला सुखशांती मिळणार नाही.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या